Kolhapur News: पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांच्या विहिरींवर शासकीय पाणीपट्टी आकारून नोटिसा बजावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही कारवाई नियमबाह्य असून पाणीपट्टी आकारण्याचा अधिकार पाटबंधारे विभागाला नसून संबंधित सहकारी पाणीपुरवठा संस्थांना आहे. .त्यामुळे ही आकारणी तत्काळ थांबवावी; अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे व कार्यकारी अभियंता स्मिता माने यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला..Water Supply Demand: जलवाहिनीचे काम बंद पाडू.निवेदनात म्हटले आहे, की, शेतकरी कालव्याच्या पाझराचे पाणी शेतीसाठी वापरत नसतील, तर काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाच्या पिकाऊ जमिनीवर पाणीपट्टी का आकारली जात आहे? पाटबंधारे विभागाने चुकीच्या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी आकारणीच्या नोटिसा पाठवल्या आहेत, त्यांनी एकत्र येऊन या अन्यायी निर्णयाविरोधात सरकार व संबंधित विभागाविरुद्ध आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे..Global Water Crisis: जागतिक पातळीवर पाणी संकट गंभीर.विहिरींवरील पाणीपट्टी भरण्याबाबत पाठविलेल्या सर्व नोटिसा तत्काळ मागे घ्याव्यात. तसेच यापुढे विहिरींवर पाणीपट्टी आकारणी करू नये; अन्यथा तीव्र लढा उभारावा लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे..या वेळी फेडरेशनचे कार्याध्यक्ष आर. जी. तांबे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, भारत पाटील-भुयेकर, बाबासाहेब देवकर, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, सुभाष शहापुरे, दत्तात्रय उगले, सुभाष जाधव, महादेव सुतार आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.