Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. असे असताना अनेक कारखान्यांकडे एफआरपी थकित आहे. सदर एफआरपीची देय रक्कम कायद्यानुसार व्याजासह अदा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले तर न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे..शेतकरी संघटनेचे नेते नीलेश शेडगे यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी आर्थिक अडचणीचे कारण देत एफआरपीची रक्कम थकविली आहे. यात सभासद शेतकऱ्यांचा दोष नसून आर्थिक कुवत नसताना गाळप क्षमता वाढ करणे, कर्ज काढून ‘अर्थपूर्ण’ हेतूसाठी नवे प्रकल्प उभारण्याचे प्रताप केल्यामुळे साखर कारखान्यांपुढे आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यात व्यवस्थापन दोषी आहे..Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर.त्याची शिक्षा ऊस उत्पादकांना कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत शेडगे म्हणाले की, जे सहकारी कारखाने आर्थिक अडचणीचे कारण देतात त्यांचे खाजगी कारखाने मात्र नफ्यात आहेत. कर्जबाजारीपण व आर्थिक अडचणी असताना देश व विदेशात दौरे सुरु आहेत. अनेक कारखान्यांनी कामगारांचे पगार थकीत असताना कामगारांच्या नावावर कर्ज काढून स्वतःचे सण साजरे केले आहेत. अशा स्थितीत संचालक मंडळ मात्र अलबेल आहे..याचिका दाखल करण्याची तयारीआता शेतकऱ्यांचा संयम सुटला असून कारखान्याच्या व्यवस्थापनाने येत्या आठ दिवसांत थकित एफआरपी १५ टक्के व्याजासह व कामगारांच्या थकीत वेतनाची रक्कम अदा करावी. अन्यथा अंदाधुंदी कारभार करून कारखान्यांना दिवाळखोरीत नेणाऱ्या संचालक मंडळाची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी न्यायालयीन याचिकेद्वारे मागणी करणार असल्याचे शेडगे म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.