Akola News: शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्यामुळे अतिशय तणावपूर्ण जीवन जगत असून त्याला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्याचे आर्थिक कवच असलेला हमीभावाचा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. .मूर्तिजापूर येथील जनमंच व प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या मार्फत देण्यात आले..Farmer Demand: वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की, शेतमालाला १ हजार ते १५०० रुपये हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जफेड करण्याची क्षमता संपली असून त्याच्याकडील असलेले चालू व थकीत पीक कर्ज सरसकट माफ करून शेतकऱ्यांना उभारी देण्यात यावी, .Farmers Demand: कृषी महोत्सव वर्षातून दोन वेळा व्हावा.सोबतच पीक विम्याचे धोरण अधिक शेतकरीभिमुख करण्याचीही निवेदनातून विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर राजूभाऊ वानखडे, प्रा.सुधाकर गौरखेडे, कैलास साबळे, मुन्ना नाईकनवरे, नंदकिशोर बबानिया, .पंकज कांबे, निखिल गावंडे, अनिल देवगिरकर, नंदकिशोर महल्ले, श्रीकृष्ण गुल्हाने, प्रफुल्ल मालधुरे,अरुण गावंडे, हरिभाऊ वानखडे, छोटूभाऊ बोंडे, प्रशांत गावंडे, जयेश टाले, पंजाबराव गावंडे, प्रकाश अंबुलकर, उमेश वरनकर अरुण बोंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.