Jalna News : गोदावरी परिसरात पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करणाऱ्या ग्रामपंचायत, कृषी विभाग, महसूलच्या पथकाला पंचनामे करण्यास विरोध करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी करीत शनिवारी (ता. २३) भादली (ता. घनसावंगी) येथील शेतकऱ्यांनी पथकाला रोखले. यामुळे या पथकाला परतावे लागले..गोदावरी परिसरात ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुंभार पिंपळगाव मंडळाचे पर्जन्यमापक यंत्र अरगडे गव्हाण (ता. घनसावंगी) या ठिकाणी बसवलेले आहे..Rain Crop Damage : साहेब, आता सगळं संपलं; शेतात फक्त पाणीच पाणी.मात्र, या ठिकाणी पाऊस झाला नाही. त्यामुळे या यंत्रात गोदावरी परिसरातील गावाचे पर्जन्यमान दाखवण्यात आलेले नाही. पाऊस पडूनही यंत्रात पावसाची नोंद नाही. दरम्यान, गोदावरी परिसरातील शेतात अजूनही पाणी आहे..Crop Damage Survey : महापुराचे पाणी शिरलेल्या सर्व शेतीचे पंचनामे करा.शनिवारी (ता. २३) परिसरातील नुकसानीची पाहणी करण्याकरिता ग्रामपंचायत अधिकारी दिलीप गणकवार, ग्राम महसूल अधिकारी भारत बरसे, सहायक कृषी अधिकारी किरण घादगिणे भादली येथे गेले होते..शासनाच्या वतीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश नाहीत. वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश आहेत. या पंचनाम्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.- किरण घादगिणे, सहायक कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.