Jalgaon News : चाळीसगावातील गिरणा ते मन्याड जोड कालव्याची गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी मागणी करीत आहेत. पण शासनाकडे यासंबंधी कार्यवाहीच केलेली नसल्याची स्थिती आहे. .२२ गावांमधील शेतकरी यासाठी पाठपुरावा, मागणी करीत आहेत. पण आश्वासनांशिवाय काहीच लागत नसल्याचा आरोप केला जात आहे. मध्यंतरी गिरणा धरणापासून कावड यात्रा काढून ‘गिरणा’चे पाणी मन्याड धरणात प्रतीकात्मकरीत्या टाकून आंदोलन करण्यात आले होते. .Drip Irrigation Projects : सूक्ष्म सिंचनच्या प्रस्तावांना पूर्वसंमतीची प्रतीक्षा.या अभिनव आंदोलनामुळे गिरणा- मन्याड जोड कालव्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्याबाबत पुन्हा एकदा मागणी केली जात आहे. मन्याड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना धरण असूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळेच गिरणा धरणातून मन्याड धरणात कालव्याद्वारे पाणी आणावे, अशी या भागातील जवळपास २२ गावांतील शेतकऱ्यांची मागणी आहे..Khandesh Irrigation Project : अपूर्ण प्रकल्पांभोवती फिरताहेय निवडणुका.या संदर्भात वारंवार मागणी करूनही शासनस्तरावर कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे या मागणीकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी ही कावड यात्रा काढली..अवर्षणप्रवण क्षेत्रमन्याड परिसर हा अवर्षणप्रवण आहे. अनेकदा दुष्काळाच्या झळा या भागास बसतात. अनेकदा गिरणा प्रकल्प भरतो, पण मन्याड प्रकल्प भरत नाही. कालवा जोड प्रकल्प लवकरात लवकर साकारला जाईल, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना आहे. गिरणा- मन्याड जोड प्रकल्पाचा सर्व्हे, त्याबाबतची कार्यवाही या बाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळत नाही, असेही सांगितले जाते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.