Rural Life Issue: दुष्काळग्रस्त भागातील शेतीला जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे, गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्पाला गती द्यावी तसेच पीकविमा व कर्जमाफीच्या मागण्यांसाठी शिरूर, बीड, गेवराई, वडवणी आणि माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. कडक उन्हात घोषणा देत आणि आसूड ओढत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला..लोकलढा आंदोलन समितीच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदारांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले..Farmer Protest: निमखेडी येथे शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’.निवेदनात नमूद केल्यानुसार, बीड जिल्ह्यातील शिरूर, बीड, गेवराई, वडवणी आणि माजलगाव तालुक्यांतील अनेक गावे कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहेत. परिणामी शेतकरी आत्महत्या, ऊस तोड मजुरीसाठी स्थलांतर, बेरोजगारी, सामाजिक समस्या आणि शेतीतील अनिश्चितता वाढत चालली आहे..शेतकऱ्यांनी या मागण्यांसाठी यापूर्वी शिरसमार्ग (ता. गेवराई) येथे १९ दिवस, तर तांदळा येथे नऊ दिवस उपोषण केले होते. तसेच १७ सप्टेंबर २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले..Indapur Water Crisis: इंदापूर पाणीप्रश्नी कृषिमंत्री भरणे, हर्षवर्धन पाटील यांचे आंदोलन.१० जूनपासून दिंडी व उपोषणाचा इशारामागण्या मान्य न झाल्यास १० जूनला पाडळसिंगी (ता. गेवराई) येथून श्रीक्षेत्र भगवानगडपर्यंत पायी दिंडी काढण्यात येईल..शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याकोकणातील १६८ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याकडे वळवून जायकवाडीमार्फत बीड जिल्ह्याला द्यावे.गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प व उपकालव्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे.बीड जिल्ह्याला मिळणाऱ्या पाण्याचा प्रकल्प अहवाल तात्काळ तयार करावा.गेवराई उजवा कालवा व माजलगाव धरणासाठी पूर्वीचे पाणी वाटप कायम ठेवावे.गतवर्षीचा पीकविमा तातडीने द्यावा.शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी द्यावी..जायकवाडीच्या पाण्यासाठी बीड, गेवराई, शिरूर, वडवणी आणि माजलगाव तालुक्यातील १४० दुष्काळी गावांतील शेतकरी एकत्र आले आहेत. शासनाने ५०० कोटी रुपयांची तरतूद करून कामे तातडीने सुरू करावीत. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारले जाईल.कुलदीप करपे, जिल्हाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना.हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना कडक उन्हात रस्त्यावर उतरावे लागणे हे दुर्दैवी आहे. गेली अनेक दशके गोदावरी आणि सिंदफणा खोऱ्यातील शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. यापुढे या आंदोलनाचा विस्तार संपूर्ण मराठवाड्यात होईल.दिनेश गुळवे, समन्वयक, लोकलढा आंदोलन समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.