Akola News: तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार परिसरात वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिवरखेड वीज केंद्रांतर्गत येणाऱ्या या परिसरात शेतातील वीजपुरवठा दररोज वारंवार खंडित होत आहे. या गंभीर समस्येकडे वीज वितरण अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे..तळेगाव बाजार परिसरात बागायती शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा, टरबूज, केळी तसेच विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. या भागात पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत शेतीसाठी वीजपुरवठा दिला जातो..Electricity Problem : वीज वितरणकडून शेतकऱ्यांची थट्टा.मात्र, या वेळेतही दररोज तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. परिणामी शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. या संदर्भात वीज वितरण अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता, आकोट येथूनच वीजपुरवठा.Electricity Problem : खानदेशात विजेचा लपंडाव सुरू.बंद केला जात आहे, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. स्थानिक पातळीवर कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तळेगाव बाजार येथील अल्पभूधारक शेतकरी वैभव चोपडे म्हणाले, की मी शेतात गहू व कांद्याची लागवड केली आहे. .मात्र दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेती करणे कठीण झाले आहे. यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित वीजपुरवठा मिळणे अत्यावश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.