Nashik News : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या ‘किंमत स्थिरीकरण निधी’ योजनेंतर्गत ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या दोन्ही नोडल एजन्सीने ३ लाख टन कांद्याची खरेदी गेल्या सहा महिन्यांपूर्वी केली. मात्र यातील २५ टक्के शेतकऱ्यांची देयके गेल्या ६ महिन्यांपासून मिळालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने पैशांसाठी शेतकऱ्यांचा नाशिक कार्यालयापासून थेट दिल्लीपर्यंत जाऊन पाठपुरावा सुरू आहे. .शुक्रवारी (ता.२) नाशिक येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘शेतकरी संवाद’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जाताना थांबविले. ‘‘आमच्या कांद्याचे पैसे कधी मिळणार?’’ असा सवाल विचारला. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढत असून शेतकरी व कृषिमंत्री आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले..Onion Farmer Issue: ग्राहक संरक्षण मंत्रालयाची मनमानी; कांदा उत्पादक हवालदिल.जवळपास एकूण खरेदीच्या २५ टक्के देयके बाकी आहेत. त्यामध्ये ‘नाफेड’कडे १५०० आणि ‘एनसीसीएफ’कडे ९०० शेतकऱ्यांनी विक्री केली. त्यांचे १०० ते १२५ कोटी रुपये मिळालेले नाहीत. कांदा विक्रीपश्चात थेट खात्यावर ७२ तासांत पैसे दिले जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र ती कागदावरच राहिली. आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांची कुचंबणा सुरू आहे. याच मुद्द्यावर कार्यक्रमात शेतकऱ्यांनी निवेदन देत सवाल उपस्थित केला..पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मागील महिन्यात दिल्ली गाठली होती. येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. मात्र ज्या विभागाने खरेदी केली, त्या ग्राहक व्यवहार विभागाचे मंत्री व अधिकारी शेतकऱ्यांना भेटतही नाहीत व त्यांची समस्या ऐकून घेत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ही अडचण श्री. चौहान यांच्याकडे मांडली..Onion Price Issue: आठ रुपयांत कांदा विकायचा तरी कसा? शेतकरी हवालदिल.कांदा खरेदीत काही त्रुटी असून, दाखवलेली खरेदी व प्रत्यक्ष खरेदी यात तफावत असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र यावर सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांचा आक्षेप आहे. एकीकडे शेतकऱ्यांची कांदा विक्रीसंबंधीची नोंद केंद्र सरकारच्या ‘सप्लाय व्हॅलीड’ पोर्टलवर आहेत. त्यामुळे ज्यांनी चुकीचे काम केले त्यांचे पैसे थांबवा; मात्र आम्ही कष्टाने कांदे पिकवले आमचे पैसे तातडीने द्या, अशी मागणी शेतकरी करत होते..प्रत्यक्ष केंद्रीय कृषिमंत्र्यांचा या खरेदीशी थेट संबंध नाही; मात्र तरीही केंद्र सरकारचा ते भाग असल्याने केंद्राला शेतकऱ्यांच्या वेदना कळवतील का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे..कैफियत मांडताना वृद्ध शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू‘‘कांदा विक्री केला, मात्र पैसे मिळाले नाहीत. या तणावाच्या परिस्थितीत हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे माझे पती गेले आता मी कशी जगू तुम्ही सांगा? मला कुठला आधार नाही,’’ अशी ढवळेश्वर (ता.मालेगाव) सुशीला बाळासाहेब पवार या वृद्ध महिला शेतकऱ्याने डोळ्यात अश्रूसह कृषिमंत्र्यांसमोर आपली समस्या मांडली. चिंचावड (ता.मालेगाव) येथील ८० वर्षांचे गंगाधर धर्मा खैरनार हेदेखील पैसे मिळावे या मागणीसाठी उपस्थित होते. ‘आम्हाला दया, भीक नको, आमचे कष्टाचे पैसे द्या. आमच्या वेदना समजून घ्या,’’ असे शेतकरी सांगत होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.