Dharashiv News: शेतीमालाची खरेदी करूनही अडत व्यापाऱ्यांकडून रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. एक) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले..शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विठ्ठल श्रीरंग काकडे या आडत दुकानदाराकडे शेतकऱ्यांनी सोयाबीन, हरभरा, ज्वारी आदी शेतीमाल विक्री केला होता. या शेतीमालाच्या रकमेची मागणी विठ्ठल काकडे व मिनिल काकडे यांच्याकडे केली असता त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. जिल्ह्यातील जवळपास पाचशे शेतकऱ्यांचे शेतीमालाचे अंदाजे १४ ते १५ कोटी रुपये संबंधित अडत दुकानदारांने अडकून ठेवले आहेत. .Kolhapur Farmers Aggressive: कामे महामार्गांची वेठीस धरला जातोय शेतकरी, महामार्गांविरोधात कोल्हापुरात २ ठिकाणी आंदोलने.शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत असताना व्यापाऱ्याने शेतीमालाचे पैसे अडवून ठेवल्याने शेतकरी आणखी संकटात सापडले. व्यापारी पैसे देत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे निवेदने देऊन कार्यवाहीची मागणी केली. मात्र जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतीमालाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले..Apmc Election : Dhiraj Deshmukh is aggressive on market committee bills| Agrowon.या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात कात्री, तीर्थ (खुर्द), कावलदरा, कामठा (ता. तुळजापूर), सकनेवाडी, मेडसिंगा, धारूर, देवळाली, चिलवडी, पिंपरी, उत्तमी कायापूर, सांजा, सुर्डी, किणी, पोहनेर, वरवंटी, खेड, पळसवाडी, राजुरी, धाराशिव, जुनोनी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. .यात महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. दरम्यान बाजार समितीचे सचिव पवन माकोडे यांच्या तक्रारीवरून व्यापारी सुनील विठ्ठल काकडे (मयत), विठ्ठल श्रीरंग काकडे व मिनिल विठ्ठल काकडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यापाऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२१ ते पाच नोव्हेंबर २०२५ पर्यंत ३७६ शेतकऱ्यांचे आठ कोटी ८१ लाख ८९ हजार ८५७ रुपये न देता फसवणूक केल्याचे माकोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.