Nanded News : विविध कारणाने अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात मार्च २०२५ पासून जुले अखेरपर्यंत २०६ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यातील १४ प्रस्ताव नामंजूर तर तब्बल ६९ प्रस्ताव कागदपत्राअभावी अपूर्ण आहेत. .तर ३१ प्रस्ताव तालुकास्तरीय समितीच्या मंजुरीअभावी प्रलंबीत आहेत. यातील पात्र ९२ शेतकऱ्यांच्या वारसांना एक कोटी ८२ लाखांच्या निधीची गरज आहे. परंतु शासनाकडून चार महिन्यापासून निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्राने दिली. .Farmer Accident Insurance Scheme : ‘अपघात विमा’च्या बैठकीत ६ प्रकरणे मंजूर.शेती व्यवसाय करताना विविध कारणाने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तसेच कायमचे अपंगत्व आले तर त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख सानुग्रह अनुदान देण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्य सरकारने ता. १९ एप्रिल २०२३ रोजी सुरु केली आहे. .यामध्ये १३ प्रकारच्या अपघाताचा समावेश करण्यात आला आहे. रस्ते अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्यामुळे अथवा चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल व अन्य कोणत्याही अपघाताचा यात समावेश करण्यात आला आहे. .ही योजना सुरु झाल्यानंतर आजपर्यंत जिल्ह्यातील १६ तालुक्यातून अनुदानासाठी प्रस्ताव दाखल झाले. दरम्यान एप्रिल २०२५ पासून जुले २०२५ या चार महिन्यात जिल्ह्यातून या योजनेसाठी २०६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यातील ९२ प्रस्ताव मंजूर तर १४ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत. यातील तब्बल ६९ प्रस्ताव कागदपत्राअभावी प्रलंबीत आहेत..Gopinath Munde Farmer Accident Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेत जिल्ह्यात ५८ प्रस्ताव मंजूर.मंजूर ९२ प्रस्तानुसार जिल्ह्याला एक कोटी ८२ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. परंतु मागील एप्रिलपासून राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला नसल्याने अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांचे शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे..प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदारांना वेळ नाहीजिल्ह्यात मार्च २०२५ पासून जुले २०२५ पर्यंत शेतकरी अपघाताच्या २०६ घटना घडल्या आहेत. यातील ३१ प्रस्ताव तहसीलदार अध्यक्ष असलेल्या तालुकास्तरीय समितीच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आले. परंतु हे प्रस्ताव तहसीलदारांना वेळ मिळत नसल्याने प्रलंबीत राहिल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात मुखेड सहा, भोकर पाच, हदगाव चार, अर्धापूर, कंधार, नायगाव व हिमायतनगर प्रत्येकी तीन, बिलोली दोन, उमरी आणि देगलूर प्रत्येकी एक प्रस्ताव प्रलंबीत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.