Farmer Issue: विदर्भात २५ वर्षांत ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
Farmer Crisis: विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची स्थिती अत्यंत वाईट बनली असून, गेल्या २५ वर्षांत चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, अपुरा पाणीपुरवठा आणि सरकारी योजनांच्या अपयशामुळे शेतकरी निराश होत टोकाचा निर्णय घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.