Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने बहुतांश शिवारात पाणी साचले आहे. त्याचा फटका सोयाबीन पिकाला बसला असून पीक पिवळे पडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे संतप्त वाई-रुई येथील एका शेतकऱ्याने चक्क पाणी भरलेल्या सोयाबीन शिवारातच ठाण मांडून अभिनव पद्धतीने आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले. .विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यात देखील पावसामुळे हाहाकार उडाल्याची स्थिती आहे..Farmer Protest: शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (श.प) नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा .शिवारात सर्वदूर पाणी साचल्याने पिकांचा अन्नद्रव्याचा पुरवठा थांबला आहे. त्यातूनच काही भागांत शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीन पिवळे पडून वाळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले..Farmer Issue: तरुण शेतकऱ्याने विविध मागण्यांसाठी घेतली नदीत उडी; शेतकरी बेपत्ता,प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू.पावसामुळे संपूर्ण हंगामच वाया गेल्याने रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठांकरिता पैशाची सोय करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. एकंदरीतच शिवारात नैराश्य निर्माण झाले आहे. यातूनच वाई रुई (ता. यवतमाळ) कुणाल जतकर यांनी पाणी साचलेल्या सोयाबीन शिवारात ठाण मांडत अभिनव आंदोलन केले..कुणाल यांचे चार एकर सोयाबीन असून, व्यवस्थापनावर एकरी ९ ते दहा हजार रुपयांचा खर्च झाला. आता मात्र त्यांच्यासह इतरही शेतकऱ्यांचे सोयाबीन पिवळे पडून वाळत असताना त्याची दखल घेण्यास कोणीच तयार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.