Farmer Protest: राज्याच्या अर्थसंकल्पात थकीत कर्जदारांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, मेडशी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदनाद्वारे दोन लाख रुपये अनुदानाची मागणी केली आहे..राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र’ अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. या अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे..Farmer Demand: वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा. मात्र, याच वेळी नियमित कर्ज फेडणाऱ्यांना केवळ ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना दोन लाख आणि नियमित फेडणाऱ्यांना फक्त ५० हजार हा कोणता न्याय? प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांवर हा अन्याय नाही का?, अशा निर्णयामुळे भविष्यात कर्ज भरावे की, कर्जमाफीची वाट पाहत थकीत ठेवावे, असा संभ्रम निर्माण होत आहे. .Farmer Demand: सरकारने आकडे दाखवून शेतकऱ्यांना फसवले.ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांना प्रोत्साहन म्हणून थकीत कर्जदारांइतकीच मदत मिळायला हवी. अन्यथा प्रामाणिक शेतकरी कर्ज भरण्याऐवजी थकीत ठेवण्याकडेच वळेल, असे निवेदनात म्हटले आहे..शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून वाढवून दोन लाख रुपये करावे, अशी मागणी करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.