Fake Agriculture Website: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी साम्य असलेले संकेतस्थळ तयार करीत ३० हजार ५०० ‘कृषिमित्र’ भरती करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यासाठी राज्यभरातून पैसे गोळा केले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ‘भरतीसंदर्भात कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. तसेच, संबंधित संकेतस्थळदेखील आमचे नाही,’ अशी स्पष्टोक्ती विद्यापीठ प्रशासनाने केली आहे..कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील यांनी सांगितले, की ‘महात्मा फुले विकास केंद्र’ अशा नावाने छत्रपती संभाजीनगर येथील एका वर्तमानपत्रात एक एप्रिल २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात या केंद्राने मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील प्रत्येक गावात एक कृषिमित्र भरला जाईल, असे म्हटले आहे..तसेच, एकूण जागा ३०५०० असून प्रत्येकाला २० हजार रुपये वेतन देण्याचे जाहिरातीत नमूद केले आहे. विद्यापीठाचा या जाहिरातीशी संबंध नाही. मात्र, विविध भागांमधून चौकशी करणारे दूरध्वनी विद्यापीठाला येत आहेत. मुळात, राज्य शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधात ‘कृषिमित्र’ नावाचे पदच नाही. त्यामुळे विद्यापीठात ‘कृषिमित्र’ असे पदनाम अस्तित्वात नाही. तसेच, अलीकडच्या काळातदेखील रिक्त पदांबाबत विद्यापीठाने कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही..Tractor Scheme Fraud: ट्रॅक्टर योजनेत शेतकऱ्याची तीन लाखांची फसवणूक.संकेतस्थळामुळे संभ्रम‘महात्मा फुले विकास केंद्रा’ने ‘कृषिमित्र’ भरती करताना संपर्कासाठी दिलेला पत्ता छत्रपती संभाजीनगर येथील आहे. कुलसचिवांच्या म्हणण्यानुसार, जाहिरातीत नमूद केलेले विभाग महात्मा फुले विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येत नाहीत. तसेच, छत्रपती संभाजीनगर भागात आमच्या विद्यापीठाचे कोणतेही कार्यालय नाही. ही भरती करण्यासाठी mpkv.com असे संकेतस्थळ देण्यात आलेले आहे. परंतु, विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ mpkv.ac.in असे आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांनी काळजीपूर्वक माहिती घ्यावी..Onion Trader Scam: भोंदू खरातने कांदा व्यापाऱ्याला घातला ८५ लाखांचा गंडा.पोलिसांसमोर आव्हानदरम्यान, कृषी विभागातील अधिकारीदेखील या भरतीने चक्रावले आहेत. सध्या विविध ठिकाणच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयांकडे या भरतीबाबत विचारणा होत आहे. ‘‘कृषी विभागात ‘कृषिमित्र’ पद अस्तित्वात नाही. गावपातळीवरील यंत्रणेत ‘कृषिसेवक’ व ‘सहायक कृषी अधिकारी’ कार्यरत असतात. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांनी स्वतःची फसवणूक टाळावी. भरतीसाठी कोणत्याही खासगी संस्थेशी आर्थिक व्यवहार करू नयेत..या संशयास्पद भरतीची दखल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेने घ्यायला हवी. ३० हजारांहून अधिक बेरोजगारांना दरमहा २० हजार रुपये वेतनाची नोकरी देणारी कृषी क्षेत्रातील ही संस्था अस्तित्वात आहे का, या संस्थेचे विश्वस्त किंवा संचालक कोण आहेत, संस्थेचे आर्थिक व्यवहार, तसेच मान्यता खात्रीशीर आहे की नाही, याबाबत पोलिसांनी माहिती घ्यायला हवी,” अशी अपेक्षा एका कृषी उपसंचालकाने व्यक्त केली..बेरोजगारांकडून पैसे गोळा करण्याचा प्रकारधाराशिवमधील एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले की, कृषी विद्यापीठाशी साम्य असलेले संकेतस्थळ तयार करणारी ही संस्था प्रत्येकाकडून २५० रुपये गोळा करीत आहे. संस्थेने संपर्कासाठी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही. भरतीची ही पद्धत पाहून आम्हाला चिंता वाटते आहे. ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. या भरतीद्वारे हजारो मुलांची फसवणूक झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आम्हाला पडला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.