Dharashiva News: यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांचे चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न पूर्ण करणारा ठरणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही अनियमित पावसाळामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. यावर्षीही खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीने वाया गेली. पण रब्बी हंगामातील पिकांची सध्याची स्थिती पाहता या हंगामातून तरी हातात चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मुबलक पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, कांदा पीक बहरले आहे..रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पेरण्या आटोपल्या. तालुक्यातील ९४ गावांत मुबलक पाऊस झाल्यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी, कूपनलिका पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके बहरली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील उत्पन्नातून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळणार आहे. यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार रब्बी हंगामातील पेरणी केली. हलक्या जमिनीवरही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन खरिपातील पिकांच्या येणाऱ्या उत्पादनावर अवलंबून असते..Rabi Season: नळेगाव परिसरात रब्बीची पिके बहरली.रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी व काही प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने उन्हाळी कांद्याचे पीक फार महत्त्वाचे असते. या कांद्याची विक्री करून येणाऱ्या पैशातून पुढील हंगामाचे आर्थिक नियोजन असते. यावर्षी पेरण्या उशिरा झाल्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा ही पिके आता बहरात आहे..Rabi Season: चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी क्षेत्र पोहोचले ५३ हजार हेक्टरवर .यावर्षीचा रब्बी हंगाम उत्पन्नाचा हंगाम ठरणार असून, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेसाठी मोठा श्वास म्हणून पाहिला जात आहे. दोन-तीन वर्षांचा दुष्काळ, पिकांचे अपयश, वाढता खर्च या संकटांनी थकलेल्या शेतकऱ्यांना यंदाचे भरघोस उत्पादन उज्ज्वल भविष्याचा किरण ठरणार आहे..२० टक्के शेतकऱ्यांकडे सौरऊर्जाअल्पभूधारक, बहुभूधारक शेतकऱ्यांची संख्या तालुक्यात जवळपास ६८ हजार आहे. साडेसात, पाच, तीन एचपीचे कूपनलिका, विहिरीवर सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप शासनाकडून अनुदानावर मिळाले आहेत. त्यामुळे विजेचा भार कमी झाला असून, तालुक्यातील एकूण शेतकरी संख्यापैकी २० टक्के शेतकऱ्यांकडे सौरऊर्जेवरील कृषिपंप उपलब्ध आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे सोपे झाले आहे..राजमा पिकाला जास्त फवारणी करण्याची आवश्यकता नाही. दर चांगला मिळत असून, राजमा पीक फुलोऱ्यात आहे. पाऊस, पाणी समाधानकारक झाल्यामुळे कांदा पीक जोमात आहे.- भैरू चोरघडे, शेतकरी, बोरगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.