Parbhani News : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, विशेषतः नदीकाठच्या गावांतील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, सर्व निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले..पालकमंत्री बोर्डीकर यांनी शुक्रवारी (ता. २६) मानवत तालुक्यातील रामपुरी आणि थार या दोन पूरग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे या गावांतील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. .Rain Crop Damage : अतिवृष्टी पीकनुकसानीचे ८६ टक्के पंचनामे पूर्ण.या स्थितीत शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत मिळावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी निधीची मागणी केली आहे हेही यावेळी स्पष्ट केले..दरवर्षी या भागात बॅकवॉटरमुळे होणारे नुकसान लक्षात घेता, जलसंपदा विभागामार्फत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले..Crop Damage Compensation : केंद्र सरकारकडूनही मिळणार मदत ः बावनकुळे.नुकसानीची नोंद तत्काळ घेण्याच्या सूचनारामपुरीतील मच्छीमारांचे जाळे वाहून गेल्याचे व शेतीत गाळ साचल्याचे निदर्शनास आणून संबंधित अधिकाऱ्यांना या नुकसानीची तातडीने नोंद घेण्याच्या सूचना पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिल्या. .शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्य ठेवावे; शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे स्पष्ट करत त्यांनी शेतकऱ्यांशी हितगुज साधत त्यांना आश्वस्त केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रेरणा वरपुडकर, सुरेश भुमरे आदी उपस्थित होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.