Sangli News : जिल्ह्यातील २२ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले असून खरीप पिकाची काढणी रखडली आहे. द्राक्ष फळ छाटणी सुरू होण्याअगोदरच छाटणीला ब्रेक लागला आहे. .जिल्ह्यातील पिकांची नुकसानीचे आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. जत, आटपाडी, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळा या तालुक्यांत शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. .रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. शेतात पाणी साचले आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढणी सुरू केली होती. मात्र, या पावसाने काढणीला अडथळे निर्माण झाले आहेत. जिल्ह्यात ६८ महसूल मंडले आहेत, त्यापैकी २२ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. या मध्ये कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर, तासगाव,आणि आटपाडी या तालुक्यांतील मंडलांत सर्वाधिक पाऊस झाला आहे..Pomegranate Export : माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीकडून डाळिंब निर्यात .खानापूर तालुक्यात पावसाने ओढ्यांना पाणी आले आहे. यामुळे विटा-पारे, बलवडी खानापूर-खरसुंडी, मोही-खानापूर,गोरेवाडी - बलवडी रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. सप्टेंबरच्या गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे साडेतीन हजार हेक्टरवरून नुकसान झाले होते. पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान अजून वाढणार असल्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे..Pomegranate Export : डाळिंबाच्या निर्यात, प्रक्रियेतील संधीचा फायदा घ्या.जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. वास्तविक पाहता अगोदरच पावसामुळे द्राक्ष फळछाटणी लांबणीवर पडली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फळछाटणीचे शेतकऱ्यांनी वेळापत्रक तयार केले होते. मात्र त्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने फळछाटणीत अडथळा निर्माण झाला आहे.तसेच द्राक्ष डाळिंब शेतात पाणी साचले आहे..जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ५०.६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८३. ६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्याचा सर्वसाधारण पाऊस १३८.७ मिलिमीटर आहे. जिल्ह्यात शुक्रवारअखेर (ता. २७) १६५.५ मिलिमीटर म्हणजे ११९ टक्के इतका पाऊस झाला आहे.तालुकानिहाय चोवीस तासांत झालेला पाऊसमिरज: ६८.१, जत : ४४.१, खानापूर - विटा: ५९.३, वाळवा: २७.८, तासगाव : ६९.९, शिराळा: २०.८, आटपाडी : ५३.४, कवठेमहांकाळ: ८३.६, पलूस: ४७.६, कडेगाव: ४०.९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.