Farming Sector Issues: ‘एल निनो’ सक्रिय झाल्याने भारतातील यंदाच्या मॉन्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना अर्थात ‘एफएओ’ने दिला आहे. विशेषतः खरीप हंगामातील पावसावर अवलंबून असलेल्या भात आणि मका यांसारख्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे..‘एफएओ’च्या मते, एल निनोमुळे केवळ शेतीच नव्हे तर अन्नसुरक्षा आणि शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या उपजीविकेलाही धोका निर्माण होऊ शकतो. भारतासह पाकिस्तान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, इंडोनेशिया आणि टिमोर-लेस्ते या देशांमध्ये कृषी दुष्काळाचा धोका वाढू शकतो. एफएओने ४१ वर्षांच्या उपग्रह चित्रांचा अभ्यास करून एल निनोमुळे सर्वाधिक कृषी दुष्काळग्रस्त ठरणारे भाग ओळखले आहेत..‘एफएओ’ने म्हटले आहे की, जागतिक हवामान संघटना म्हणजेच डब्ल्यूएमओने यंदा सरासरीपेक्षा अधिक सक्रिय मॉन्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील मॉन्सून कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे खरीप हंगामात भात आणि मका या प्रमुख पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज आहे. २०१५-१६ च्या तीव्र एल निनो काळात भारतातील मक्याचे उत्पादन ४ टक्क्यांनी घटले होते,.El Nino: एल निनो सक्रिय; ‘आयएमडी’चा दुजोरा.तर भात उत्पादनात १ टक्क्यांची घट झाली होती. त्याच काळात आग्नेय आशियामध्ये सुमारे १.५ कोटी टन भाताचे नुकसान झाले होते. परिणामी जागतिक बाजारात भाताच्या किमती वाढल्या आणि आयातीवर अवलंबून असलेल्या देशांची कोंडी झाली होती. यंदा परिस्थिती पूर्वीच्या एल निनोपेक्षा अधिक गंभीर ठरू शकते, असा इशाराही एफएओने दिला आहे..Maharashtra Agriculture Crisis: संकट काळात गरज जबाबदारीने वागण्याची.जागतिक तापमान वाढ, विविध देशांतील संघर्ष आणि अन्नसुरक्षेची वाढती समस्या यामुळे या एल निनोचा सर्वाधिक फटका आधीच संकटात असलेल्या आणि मर्यादित संसाधने असलेल्या देशांना बसण्याची शक्यता आहे. एफएओच्या अंदाजानुसार, संभाव्य दुष्काळाच्या परिणामांपैकी ८० टक्क्यांहून अधिक परिणाम कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होणार आहेत..पश्चिम आशियातील तणावाचा झटकापश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतुकीतील अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऊर्जा आणि खतांच्या किमती वाढण्याचा धोका असल्याचे निरीक्षणही एफएओने नोंदवले आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या काळात याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर होऊ शकतो. परंतु वेळेवर उपाययोजना केल्यास नुकसान कमी करता येऊ शकते, असे एफएओने म्हटले आहे..दरम्यान, २०२३-२४ मधील एल निनोपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील सात देशांमध्ये सुमारे ३१ दशलक्ष डॉलरची मदत पुरविण्यात आली होती. त्यातून २० लाखांहून अधिक लोकांना बियाणे, पशुधन सहाय्य आणि पूर्वसूचना यंत्रणेचा लाभ मिळाला होता, असेही एफएओने नमूद केले आहे..पाऊस कमी झाला की सर्वात आधी शेतीला फटका बसतो. सुरुवातीला शेतकऱ्याचे पीक जाते, त्यानंतर पशुधनावर परिणाम होतो आणि अखेरीस त्याच्या संपूर्ण उपजीविकेवर संकट येते. यंदाचा एल निनो पूर्वीसारखा नाही. आज पृथ्वी खूपच उष्ण झाली आहे. संघर्षाचे वातावरण आणि अन्नसुरक्षेची कमतरता हे चित्र सार्वत्रिक असल्याने त्याचा सर्वाधिक फटका दुर्बल घटकांना बसणार आहे.जॉर्ज अल्वार-बेल्ट्रान, नैसर्गिक संसाधन अधिकारी, अन्न आणि कृषी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.