Agriculture Mangement: शेतकरी नियोजन । रेशीमशेतीशेतकरी : मोहन लाडगाव : मानवत, ता. मानवत, जि. परभणीएकूण क्षेत्र : ३९ एकरतुती लागवड : २ एकर.परभणी जिल्ह्यातील मानवत येथील मोहन केशवराव लाड यांनी संगोपनगृहामध्ये दुहेरी मच्छरदाणीचा वापर करत रेशीम कीटकांवरील उझी माशीचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळविले आहे. याद्वारे दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात मिळविण्यात सातत्य राखले आहे..मानवत येथील केशवराव लाड यांचे दिलीप, मोहन, गुलाब या तीन भावांचे संयुक्त कुटुंब आहे. कुटुंबाची मानवत शहरालगतच ३९ एकर शेती आहे. त्यात कापूस, तूर, गहू या पिकांसोबत संत्र्याची ८०० झाडे आहेत. सिंचनासाठी दोन विहिरी असून मुबलक पाणी आहे. लाड बंधूंनी पारंपारिक शेतीला रेशीम शेती आणि दुग्ध व्यवसाय या पूरक व्यवसायांची जोड दिली आहे. मोहन आणि गुलाब हे लाड बंधू रेशीम शेतीचे व्यवस्थापन करतात..Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून विकासाकडे वाटचाल.बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील रेशीम उत्पादक शेतकरी राधेश्याम खुडे यांच्या मार्गदर्शनातून मोहन लाड यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २०१८ मध्ये सव्वा एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली. सुरुवातीला प्रायोगिक स्वरूपात ५० अंडीपुंजांच्या बॅचद्वारे रेशीम कोष उत्पादन घेतले. त्यात यश मिळाले. त्यांनी व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यासाठी संगोपनगृह उभारणी, तुती लागवड क्षेत्रात वाढ करत दर्जेदार कोष उत्पादन घेण्यास सुरुवात केली..सध्या त्यांच्याकडे २५ फूट बाय ५० फूट आकाराची २ रेशीम कीटक संगोपनगृह आहेत. त्यात वर्षभरात रेशीम कोष उत्पादनाच्या ५ ते ६ बॅच घेतल्या जातात. दरवर्षी साधारण जून महिन्यापासून रेशीम कोष उत्पादनास सुरुवात केली जाते. प्रत्येक दोन बॅचमध्ये एक महिन्याचे अंतर ठेवले जाते. जून ते डिसेंबर या कालावधीत ४ बॅच, तर जानेवारी ते मार्च या कालावधीत २ बॅच घेतात. .प्रत्येक बॅच २०० अंडीपुजाची असते. त्यापासून सरासरी १९० ते २०० किलो कोष उत्पादन मिळते. उत्पादित कोषाची सुरुवातीची काही वर्षे कर्नाटक येथील रामनगरम मार्केटमध्ये विक्री केली. मागील काही वर्षात बीड किंवा जालना येथील रेशीम कोष मार्केटमध्ये कोष विक्री करत आहेत..Silk Farming : रेशीम उद्योगाने वाचविली तोट्यातील शेती .तुती बाग व्यवस्थापनरेशीम शेतीला सुरुवात केल्यानंतर २०१८ मध्ये सव्वा एकरात तुतीच्या व्ही १ या वाणाची रोपे विकत आणून ५ बाय २ फूट अंतरावर लागवड केली. तुती लागवडीत रासायनिक खतांचा वापर करण्याचे टाळले जाते. बागेत चांगले कुजलेले शेणखताच्या वापरावर भर दिला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत झाली आहे. .२०२४ मध्ये ३० गुंठे क्षेत्रावर सुधारित पद्धतीने ३ फूट बाय ६ फूट अंतरावर नवीन लागवड आहे. ही लागवड ट्री पद्धतीने केल्यामुळे बागेत दाटी कमी होण्यास मदत होते. शिवाय एका बुंध्यावर जमिनीपासून दोन फुटांवर १० ते १५ फांद्या ठेवता येतात. त्यातून दर्जेदार हिरव्या पानांचे उत्पादन मिळते. शेणखताच्या वापरावर भर दिल्याचे बागेत चांगले परिणाम दिसत आहेत. बागेत कीड-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी आहे. असे श्री. लाड सांगतात..संगोपनगृह व्यवस्थापनकाटेकोर व्यवस्थापनातून दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेण्याचा लाड बंधूंचा प्रयत्न असतो. संगोपनगृहात ऋतुनिहाय योग्य बदल करणे अत्यंत आवश्यक असते. कारण, बदलत्या वातावरणाचा रेशीम कीटकांच्या कोष तयार करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. थंडी, उन्ह, वारे यापासून रेशीम कीटकांचे संरक्षण करण्यासाठी संगोपनगृहाच्या निवाऱ्याभोवती तागाचे कापड लावले आहे. त्यामुळे रेशीम कीटक संगोपनासाठी आवश्यक तापमान राखणे शक्य होते. .उन्हाळ्यात शेडभोवती ग्रीन नेट लावले जाते. तसेच टीन पत्र्याच्या छतावरील चार बाजूंनी ठिबकच्या लॅटरल लावून त्याद्वारे दिवसभर पाणी सोडले जाते. त्यामुळे संगोपनगृहात गारवा निर्माण होण्यास मदत मिळते. कारण, उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानाचा रेशीम अळ्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी शेडमधील तापमान योग्य राखण्यासाठी प्रयत्न केले जातात, असे श्री. लाड सांगतात..बॅच नियोजनयंदा १५ जूननंतर कोष उत्पादन सुरु करण्यात आले. आजवर रेशीम कोष उत्पादनाच्या २ बॅच घेतल्या आहेत.पहिल्या बॅचमध्ये १५० अंडीपुंजांपासून १५५ किलो कोष उत्पादन मिळाले. त्यानंतर १२ ऑगस्टला २०० अंडीपुंजाची दुसरी बॅच सुरु केली. या बॅचमधील कोष काढणी मागील आठवड्यात मंगळवारी व बुधवारी केली. त्यातून १७७ किलो कोष उत्पादन मिळाले आहे. या कोषाची विक्री गुरुवारी बीड येथील रेशीम कोष मार्केटमध्ये केली आहे.या बॅचमधील कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर रेशीम कीटक संगोपनगृहात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाच्या कामांवर भर देण्यात आला. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते.त्यानंतर तुती बागेत छाटणीची कामे करण्यात आली..आगामी नियोजनपुढील पंधरा दिवसांत संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले जाईल.तुती बागेमध्ये खुरपणी, वखरणी आदी कामे करून आंतरमशागत केली जाईल.पुढील बॅच ४ ऑक्टोबरपासून घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी खरपुडी (जि. जालना) येथून २०० अंडीपुंजांची मागणी केली आहे. त्यानुसार बॅच नियोजन केले जाईल..उझी माशीचे व्यवस्थापनरेशीम कोष उत्पादन घेताना विशेषतः उझी माशीचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण बॅच बाद होण्याची धोका असतो. त्यासाठी उझी माशीवर वेळीच नियंत्रण मिळविणे अत्यंत आवश्यक ठरते. उझी माशीच्या नियंत्रणासाठी रॅक भोवती मच्छरदाणी दुहेरी करून (दोन स्तरामध्ये) लावली जाते. त्यामुळे आतमध्ये उझी माशीचा शिरकाव होण्यापासून अटकाव केला जातो. तसेच संगोपनगृहामध्ये १० ते १० फूट आकाराचे केबिन आहे. फिडींग करण्यापूर्वी तुती पाने केबिनमध्ये ठेवली जातात. त्यामुळे देखील उझी माशीचे नियंत्रण होण्यास मदत मिळते. संगोपनगृहातील स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व देतात. त्यामुळे आजवर रेशीम कोष उत्पादनाची एकही बॅच अयशस्वी झालेली नाही. अनुभवातून रेशीम कोष उत्पादनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात केली आहे.- मोहन लाड ९०११७२१७२१(शब्दांकन : माणिक रासवे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.