Farmers Facing Kharif Crop Problems: पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांत पावसाचे असमान वितरण आणि खंडामुळे खरीप पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र जवळपास ९७ टक्क्यांवर पोहोचले असले, तरी पूर्व भागातील अनेक गावांमध्ये जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे पुढील काळात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे..जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख दोन हजार २६३ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत एक लाख ९५ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९७ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सुमारे ५६ हजार हेक्टर भात क्षेत्राचा समावेश आहे. पश्चिम भागात पावसाची स्थिती तुलनेने चांगली असली, तरी पूर्व भागातील पावसावर अवलंबून असलेल्या शेतीसमोर पावसाच्या खंडाचे संकट निर्माण झाले आहे..१ जून ते २९ ऑगस्टदरम्यान पुरंदर, शिरूर, बारामती आणि दौंड तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मात्र, इंदापूर तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदला गेला आहे. तालुक्याची एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी समाधानकारक दिसत असली, तरी पावसाचे कालावधीतील वितरण आणि गावनिहाय तफावत यामुळे शेतीची स्थिती सर्वत्र सारखी नाही..Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत.पावसाळ्याचे तीन महिने झाले आहेत. मात्र, पूर्व भागात पावसाच्या सरींचे सातत्य राहिलेले नाही. झालेला अधूनमधून झाल्याने ओलावा टिकून राहिलेला नाही. विशेषतः हलक्या जमिनीतील बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस यांसह अन्य खरीप पिकांना पावसातील खंडाचा फटका बसत आहे..पिकांची वाढ खुंटलीपूर्व भागातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. सुरुवातीच्या काळात पेरणीसाठी आवश्यक पाऊस झाल्यानंतर अनेक ठिकाणी पिकांची उगवण चांगली झाली. मात्र, त्यानंतर अपेक्षित दमदार पाऊस न झाल्याने काही भागांत पिकांची वाढ खुंटली आहे. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पिकांना खताची मात्रा द्यायची की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे..पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पावसाचा खंड कायम राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात चांगल्या पावसाची गरज आहे. एक-दोन दमदार सरी झाल्यास जमिनीतील ओलावा वाढून पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो..Delayed Sowing Impact: प्रमुख पीक उत्पादनात ७ टक्के घट शक्य.पावसाचा अधिक खंडपूर्व भागातील तालुक्यांची एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी सरासरीच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक असली, तरी केवळ एकूण पावसावरून शेतीची स्थिती चांगली असल्याचे म्हणता येणार नाही. पावसाचा कालावधी, दोन सरींमधील खंड, पावसाची तीव्रता आणि गावनिहाय वितरण या बाबी पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याची नोंद असतानाही पिकांना सध्या ओलाव्याच्या ताणाला सामोरे जावे लागत आहे..खरीप पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)खरीप ज्वारी १०१, भात ५६,५२५, बाजरी ३५,२६५, रागी ८९०, मका ३१,३११, इतर तृणधान्ये १४५४, तूर १३३४, मूग ४८६३, उडीद १२९९, इतर कडधान्ये ४८१५, भुईमूग ६१२१, तीळ १४, सूर्यफूल ७९५, सोयाबीन ४९,१६५, कापूस १८६४, इतर गळीतधान्य १२६..पुणे जिल्ह्यात १ जून ते २९ ऑगस्ट या कालावधीतील पावसाची स्थिती : पाऊस (मिलिमीटरमध्ये)तालुका सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस टक्केहवेली ५४३.५ ५६६.० १२७मुळशी १३५७.६ १५६१.७ ११५भोर ८२८.४ ९३०.८ ११२मावळ ९९३.५ २१९७ २२१वेल्हे २०९० १५८५ ७५जुन्नर ४७१.४ ६२८.६ १३३खेड ४०३ ८११ २०१आंबेगाव ५३२.१ ८५५ १६०शिरूर २२२.६ २३८.२ १०७बारामती २०४.५ २१२.० १०३इंदापूर २६२.२ २१९.८ ८३दौंड २१०.६ २१३.० १०१पुरंदर ३२४.७ ३४५.४ १०६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.