Farmer Crisis: राज्यात ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाईचे संकट गडद झाल्याने शेती मशागतीची कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत ही परिस्थिती आहे. आधीच इंधन दरवाढ, मशागतींसह मजुरीतही वाढ झाल्यानंतर आता डिझेलटंचाईने शेतकरी पुरता हैराण झाले आहेत.