FRP Dues Maharashtra : सोलापूर शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांचा प्रश्न आता साखर कारखान्यांच्या आगामी गाळप हंगामाच्या परवान्यापर्यंत पोहोचला आहे. आरआरसी कारवाई झालेल्या किंवा त्यासाठी शिफारस केलेल्या कारखान्यांना २०२६-२७च्या गाळप हंगामासाठी परवाना देऊ नये, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने सोलापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांकडे (साखर) केली आहे. .मागणीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी साखर आयुक्त (पुणे) यांच्या नावे हे निवेदन सादर केले. .Sugar Industry Asset Seizure: आणखी तीन कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई.सोलापूर विभागातील अनेक साखर कारखान्यांनी २०२४-२५ आणि २०२५-२६च्या हंगामातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची थकबाकी तसेच तोडणी व वाहतूक कामगारांची बिले अद्याप अदा केलेली नाहीत..Sugar Factory Loan: राज्यातील दोन साखर कारखान्यांना दिलासा; ३३५ कोटींचे कर्ज मंजूर.बिलांचा अद्ययावत अहवाल घ्यादरवर्षी गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यांना परवाना देताना त्यांच्या थकीत देयकांचा आढावा घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची जुनी देणी न भागविता पुन्हा गाळप परवाना दिल्यास त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. .त्यामुळे संबंधित कारखान्यांकडून थकीत बिले, एफआरपी तसेच तोडणी-वाहतूक बिलांचा अद्ययावत अहवाल घेऊनच गाळप परवाने द्यावेत, अशी भूमिका समितीने मांडली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.