Sangli News: सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात वाकुर्डे आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या लाभ क्षेत्रात काहीअंशी पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे दोन्ही योजनांचे रब्बी हंगामाचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागला आहे..जिल्ह्यातील पाच मध्यम व ७८ लघू असे एकूण ८३ प्रकल्पात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ९१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. वास्तविक पाहता, दुष्काळी तालुक्यातील खानापूर, आटपाडी, कडेगाव, तासगाव, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातही प्रकल्पात ८५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे..Agriculture Irrigation: ‘विष्णुपुरी’तून दोन पाणीपाळ्या मिळणार .मात्र, या प्रकल्पातील पाणीसाठा शेतीसाठी उपसा होऊ लागला आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा काही अंशी कमी झाला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातही शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याने रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. .Agriculture Irrigation Issue: मळदमधील पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी.त्यामुळे ताकारी योजनेचे आवर्तन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू केले आहे. त्यामुळे ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.शिराळा तालुक्यात वाकुर्डे उपसा सिंचन योजना आहे..शिराळा, वाळवा आणि कऱ्हाड तालुक्यांच्या दक्षिणेला या योजनेचे लाभ क्षेत्र आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.