Akola News: राज्यात केळीचे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. मात्र ठोस बाजारपेठ नसल्याने निर्यात करणाऱ्या कंपन्या, देशांतर्गत व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे केळी उत्पादक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने केळी पिकाला हमीभाव द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय बनाना महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक सचिन कोरडे यांनी केली आहे..नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसांपूर्वी आले असताना खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून त्यांना निवेदन देण्यात आले..Banana Farmers: खर्चही निघत नसल्याने केळीच्या बागांवर फिरवला रोटावेटर.शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना केळी पिकास लागू केल्यापासून या पिकाची महाराष्ट्रात झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र आज शेतकऱ्यांना कवडीमोल दराने आपला माल व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे..Banana Rate: खानदेशात केळी दरांवर चार महिन्यांपासून दबाव.लागवडीसाठी उत्पादन खर्च हा सरासरी एक लाख ४५ हजार रुपये येत असून उत्पादन २० ते ३० हजार एवढेच मिळत आहे. सध्या दर नसल्याने बागांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे..शासनाने याची गंभीर दखल घेत व शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता केळीस प्रति किलो किमान आधारभूत किंमत २४ रुपये ३० पैसे हमीभाव जाहीर करावा, केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा. तसेच पीकविमा कंपन्यांची मनमानी थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.