Agriculture Department: खरीप हंगामाच्या तोंडावर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आलेले भुईमुगाचे प्रमाणित बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने २३ जून रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने बियाणे बदलून देण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत..कृषी विभागाकडून वितरित करण्यात आलेले भुईमुगाचे ८५० क्विंटल बियाणे बदलून देण्याचे निर्देश सातारा जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना भुईमूगाचे एक हजार हेक्टर पीक प्रात्याक्षिके आणि सहा हजार क्विंटल प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या गटांना व शेतकऱ्यांना हिल इंडिया लिमिटेड या अधिकृत बियाणे उत्पादक कंपनीला तीन हजार ३२२.२४ क्विंटल भुईमूग बियाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले..Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब .वितरित केलेल्या बियाण्याचा वाण कादिरी लेपाक्षी आहे. संबंधित कंपनीने १३ जूनपर्यंत एक हजार ७१७ क्विंटल बियाणे पुरवठा केला. शेतकऱ्यांना पेरणी करताना बियाणे निकृष्ट दर्जाचे तसेच त्यात माती, खडे मिश्रित असल्याचे दिसून आले. त्याबाबत ‘ॲग्रोवन’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची कृषी विभागाने दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे..Groundnut Seed Issue: ‘कृषी’कडून वितरित भुईमूग बियाण्यांवर शेतकऱ्यांची नाराजी; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह.शेतकऱ्यांनी मानले ‘ॲग्रोवन’चे आभार‘‘ऐन खरीप हंगामात पेरणीवेळी कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या भुईमूगाचे बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. बियाण्याचा आकार, रंग, दर्जा आणि त्यामधील तुटलेले तसेच खराब दाणे पाहता ते निकृष्ट असल्याचे दिसून आले. त्या अडचणीतील शेतकऱ्यांचा ‘ॲग्रोवन’ आवाज बनल्यामुळेच आम्हाला बियाणे बदलून मिळणार आहे,’’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. तसेच त्यांनी ‘ॲग्रोवन’चे आभार मानले..कृषी विभागाकडून देण्यात आलेले बियाणे निकृष्ट असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच कृषिमंत्र्यांनी त्याची दखल घेत मला विचारणा केली. कृषी विभागाकडून संबंधित कंपनीला तत्काळ त्याची माहिती दिली. कंपनीचे दोन प्रतिनिधी येऊन त्या बियाण्याची पाहणी करून गेले. निकृष्ट बियाणे परत घेऊन चांगल्या बियाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांना ८५० क्विंटल बियाणे बदलून दिले जाईल.भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.