Ahmednagar News: शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच कांदा आणि त्या बाबतचे धोरण ठरवावे, अशी मागणी करणारे पत्र लोक आंदोलन न्यासातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे..लोकआंदोलन न्यासच्या कार्याध्यक्ष कल्पना इनामदार यांनी पंतप्रधान मोदी यांना नुकतेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याबाबतचे पत्र पाठवले आहे..Onion Policy : कांद्याचा उत्पादन खर्च निश्चित करून सरकारला शिफारस करणार.या वेळी इनामदार म्हणाल्या, आम्ही लवकरच शेतकरी कर्जमाफी आणि कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. यासाठी शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहोत..Onion Export Policy : धोरणात तातडीने बदल करा; कांदा उत्पादकांना न्याय द्या.शेतकरी सध्या शेतीमालाला बाजारभाव नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्यक आहे. कांद्याचे बाजारभाव खूप कमी झाले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे कांद्याची निर्यात तातडीने सुरू करण्यात यावी..या दोन मागण्यासाठी आम्ही पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे खजिनदार दत्ता आवारी यांनी सांगितले. संपूर्ण देशभरातील व प्रत्येक राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्या वतीनेही आम्ही पंतप्रधान मोदी यांना या मागणीचे पत्र पाठविण्याचे नियोजित केले आहे, असे डॉ. कमल टॉवरी यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.