Akola News: एखाद्या गावाच्या मातीतच देशभक्तीचा गुण दडलेला असतो, असे म्हणतात. जिल्ह्यातील दानापूर (ता. तेल्हारा) हे गावसुद्धा अशाच परंपरेतले. प्रयोगशील शेतीसाठी गावाची ओळख तयार झालेली आहेच. शिवाय, देशभक्तीही गावातील तरुणांमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळेच गावातील तरुण सैन्य व पोलिस दलात सेवा देण्यात मागे नाहीत. .तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे साधारणपणे ८००० लोकसंखेचे गाव. सातपुड्याच्या कुशीतून उगम पावणाऱ्या वान नदीच्या तीरावर वसलेले दानापूर हे गाव आज केवळ कृषिसमृद्ध गाव म्हणून नव्हे, तर सैनिक, पोलिस व अधिकारी घडवणारे संस्कारक्षम गाव म्हणून ओळखले जाते..Agriculture Innovation: तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे आवश्यक : संजय किर्लोस्कर.या आपल्या असामान्य देशसेवेच्या परंपरेमुळे संपूर्ण जिल्ह्याचे गाव लक्ष वेधून घेत आहे. या गावातून आजपर्यंत ३४ जवान भारतीय सैन्य दलात दाखल झाले असून, देशाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली आहे..यातील तीन जवानांनी नुकतीच सेवा पूर्ण करून सन्मानपूर्वक कार्यमुक्तता घेतली आहे. गावातील प्रत्येक घरात देशसेवेचा अभिमान बाळगला जात असून, शहीद जवानांच्या कथा, सैनिकी शिस्त आणि तिरंग्याचा सन्मान हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे..दानापूरची ही परंपरा केवळ सैन्यापर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. आजपर्यंत ३१ युवक पोलिस व संलग्न सेवांमध्ये अधिकारी-कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यापैकी १९ पोलिस कॉन्स्टेबल्स विविध जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्था सांभाळत आहेत. आता येथील तरुणीसुद्धा या सेवांमध्ये भरती होऊ लागल्या आहेत..Inspiring Story: जगाचा शब्द नाही, तर सोन्याचा श्वास ऐकला !.या यशामागे गावातील मार्गदर्शकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे. श्रीकांत येवतकर आणि अमोल गौर हे वेळोवेळी युवकांना स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया व मानसिक तयारीसाठी मार्गदर्शन करतात. तर प्रशिक्षक गौरव मिसाळ हे येथील युवक-युवतींत शारीरिक प्रशिक्षण, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. तसेच पोलिस दलात कार्यरत असलेले अधिकारी आपले अनुभव गावातील तरुणांसाठी सातत्याने मांडत असतात. ग्रामपंचायतीपासून पालकांपर्यंत सर्वच घटक तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत..अशीही देशभक्ती जोपासलीप्रत्यक्ष सीमेवर न जाताही देशभक्ती जोपासता येऊ शकते, तरुण पिढी घडवता येईल, या हेतूने गावातील रहिवासी व सध्या नागपूर येथे न्यायालयात प्रॅक्टिस करीत असलेले अॅड. विनय घायल यांनी (कै.) पुंडलिकराव घायल कौटिल्य अभ्यासिका व ग्रंथालय उघडत गावातील तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली..स्वतःच्या राहत्या घरात अभ्यासिकेला जागाही उपलब्ध करून दिली. २०१२ पासून सुरू असलेल्या या अभ्यासिकेच्या माध्यमातून २७ जणांना शासकीय सेवेचे दरवाजे उघडले गेले आहेत. आज अभ्यासिकेत ऑनलाइन क्लासेस, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार असे उपक्रम राबवले जात आहेत.....याची आहे गरजआज गावातील शेकडो तरुण-तरुणी हे सैन्य, पोलिस भरतीसाठी नियमित सराव करतात. त्यांना सरावासाठी सर्वसुविधा युक्त मैदान, ४०० मीटरचा ट्रॅक, ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सार्वजनिक वाचनालयाची सुविधा हवी आहे. यासाठी पुढाकार घेतला गेल्यास निश्चितच आणखी तरुण-तरुणी देशसेवेच्या मार्गावर पुढे जातील, अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.