Thane News: शहापूर तालुक्यातील डोळखांब आणि किन्हवली परिसरातील गावांच्या जंगलात नीलगाईंचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यात आता पिके जोम धरू लागली असतानाच नीलगाई शेतात घुसून उभी पिके खाऊन नष्ट करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे..सध्या तालुक्यात वाल, हरभरा, मूग, चवळी, दुधी, घोसाळी, भेंडी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. ही पिके वाढीच्या टप्प्यावर असतानाच नीलगाईंच्या कळपांनी शेतात धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत..Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक.नीलगाईंच्या वाढत्या उपद्रवामुळे एक गंभीर घटना गुंड्याचा पाडा येथे घडली. नीलगाईने जोरदार मुसंडी मारल्याने निर्मलाबाई वेखंडे (वय ६५) या महिलेला जीव गमवावा लागला होता, तर त्यांचा नातू भावेश प्रकाश वेखंडे हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोठमोठ्या कळपांनी उभ्या शेतात घुसून नुकसान केल्यामुळे केवळ पिकांचेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. .Wildlife Crop Damage : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील वानर, माकडांचा प्रश्न संसदेत.त्यामुळे नीलगाईंच्या उपद्रवापासून शेतकरी व पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तत्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मोठ्या कळपांनी पिके उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे..उभी पिके नष्ट झाल्यामुळे रब्बी हंगामातील उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर येत्या काही आठवड्यांत रब्बी उत्पादनात ३० ते ४० टक्के घटयेऊ शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.