Pune News: पुरंदर तालुक्यातील काळदरी परिसरात सतत पडणाऱ्या पावसाने सोयाबीन, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल पिके बहरली आहेत. काही फुलोऱ्यात तर काही परिपक्व होण्याच्या मार्गावर आहेत. पावसामुळे भात पिकाचीही चांगली वाढ झाली आहे. काही ठिकाणी कडधान्य पिकांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे..उन्हाळी पावसाबरोबर मॉन्सून चांगला बरसल्याने परिसरातील सर्व जलाशय, तलाव, विहिरी पाण्याने तुडुंब भरल्याने पिकांना पाण्याचा तुटवडा जाणवला नाही. खरिपातील सर्व पिके जोमात असताना पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने दाणे भरण्याच्या काळात पाण्याची गरज भागल्याने पिके जोमदार आली आहेत. पीक काढणीच्या काळात पावसाने पूर्णविराम घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असे चित्र आहे..Agriculture Success: नगदी पिकांतून दिले अर्थकारणाला बळ.परिंचे मंडल कृषी कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार बाजरी १६७० हेक्टर, भुईमूग ६५०, सोयाबीन ६५०, मूग ४०, उडीद ३०, सूर्यफूल ४०, काळदरी, मांढर परिसरात ४०५ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. मांढर परिसरात भाताचे पीक जोमदार आले असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष तानाजी पापळ यांनी सांगितले आहे..सतत पडणाऱ्या पावसाने इतर पिके चांगली दिसत असली, तरी मूग, उडीद, घेवडा आदी कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेंगांना कोंब फुटले असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मयूर मुळीक (सरकार), शेतकरी.परिंचे कृषी मंडल कार्यक्षेत्राचा विचार केला असता यंदा परिसरातील पिके जोमदार आली आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा पिकांवर रोगराई कमी प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामातील कांदा रोपवाटिका तयार करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.अनिल धुरगुडे, मंडल कृषी अधिकारी, ता. पुरंदर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.