Agriculture Crisis : आर्णी तालुक्यात झालेल्या सलग पावसामुळे खरीप पिकांना पोषक ओलावा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसमोर तण व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांमध्ये तण व गवताची झपाट्याने वाढ झाली असून वेळेत निंदण करणे अत्यावश्यक झाले आहे..मात्र, महिला शेतमजुरांची तीव्र टंचाई असल्याने शेतकऱ्यांना वाढीव मजुरी देऊनही वेळेवर निंदणी पूर्ण करता येत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असून पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे..Farm Irrigation: पावसाच्या दडीमुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार.गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसानंतर वातावरणात काही प्रमाणात उघडीप मिळाली असली, तरी अधूनमधून सुरू असलेल्या सरींमुळे शेतशिवार अजूनही चिखलमय आहे. त्यामुळे आंतरमशागत, डवरे आणि फवारणीची कामे काही ठप्प झाली. या कालावधीत कपाशी, सोयाबीन व तूर पिकांमध्ये तण आणि गवताची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली. .Kharif Crops Affected: पिके पावसाच्या प्रतीक्षेत.अनेक शेतांमध्ये पिकांपेक्षा तणच अधिक वाढल्याने पिके दिसेनाशी झाल्याचे चित्र आहे. सध्या तालुकाभर निंदणाची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, उपलब्ध महिला मजूर सकाळी एका शेतात तर दुपारी दुसऱ्या शेतात अशा दुहेरी पाळीत काम करत असल्याने सर्व शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही. .परिणामी, निंदणाला विलंब होत असून तणाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. निंदणासाठी सकाळच्या पाळीत एका महिला मजुराला सुमारे २०० रुपये, तर दुपारच्या पाळीसाठी १०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.