आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहेशेतकऱ्यांना पीक उत्पादनातील नुकसान टाळण्यासाठी तत्काळ पुनरुज्जीवन उपाययोजना करण्याचा सल्लापीक व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे जारी.Crop Management: आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः येथील दक्षिण किनारपट्टीच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पीक उत्पादनातील नुकसान टाळण्यासाठी तत्काळ पुनरुज्जीवन उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. आचार्य एनजी रंगा कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक शिफारशींवर आधारे, कृषी विभागाने शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या शेतजमिनीची पुनर्बांधणी करण्यास मदत व्हावी, यासाठी पीक व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे..आंध्र प्रदेशात सुमारे १५.५८ लाख हेक्टर क्षेत्रावर भात पीक क्षेत्र आहे. यामुळे मुसळधार पावसाचा भातशेतीला सर्वाधिक फटका बसला. येथील बापटला, पालनाडू आणि नंद्याल जिल्ह्यातील भात पीक लोंबी धरण्याच्या अवस्थेत आहे. तर कृष्णा आणि गोदावरी डेल्टा प्रदेशातील पिके फुलोरा आणि कापणीच्या टप्प्यात आहेत. पीक वाढीच्या या महत्त्वाच्या टप्प्यात अवकाळी पावसामुळे परिणाम झाला आहे. .Paddy Harvesting : पावसाचा भात कापणीत व्यत्यय.कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतातील साचून राहिलेले पाणी तत्काळ काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. जिथे छोट्या शेतजमिनीतील भात पीक दुधाळ अवस्थेत आहे, तिथे आडवे झालेले पीक हळूवारपणे उभे करावे. तर मोठ्या क्षेत्रातील पाण्याचा योग्य निचरा करावा. बुरशीजन्य रोग आणि धान्याचा रंग बदलू नये यासाठी, प्रति एकर २०० मिली प्रोपिकोनाजोलची फवारणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. .Paddy Crop Damage : पावसाचा भात पिकाला फटका.ज्या शेतात पीक कापणीच्या टप्प्यावर आहेत, तेथे पाटांमधून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करावा. त्यासाठी लोंबीवर ५ टक्के मीठ द्रावणाची (५० ग्रॅम मीठ प्रति लिटर पाण्यात मिसळावे) फवारणी करावी; जेणेकरून पिकाचा अंकुर वाढू नये आणि त्याचा रंग बदलू नये. उशिरा पेरणी केलेल्या भातशेतीतील, पाणी हटल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रति एकर २० किलो युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) चा वापर करावा. नेल्लोर, तिरुपती आणि चित्तूर जिल्ह्यांमध्ये, पिकातील पाणी पाच दिवसांच्या आत हटल्यानंतर शेतकऱ्यांना प्रति पाच सेंट्स क्षेत्रासाठी एक किलो युरिया आणि एक किलो पोटॅशचा बूस्टर डोस देण्याचा सल्ला देण्यात आला आहे..रोपांची कुज रोखण्यासाठी, कार्बेन्डाझिम (१ ग्रॅम/लिटर) किंवा कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब (२ ग्रॅम/लिटर) फवारणी करण्याचा सल्लाही दिला जातो..कापूस आणि भुईमूग पिकाच्या, पानांवर ठिपके पडणाऱ्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी हेक्साकोनाझोल (२ मिली/लिटर) अथवा कार्बेन्डाझिम (१ ग्रॅम/प्रति लिटर) ची १५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. कापसातील फुले आणि बोंड गळीच्या नियंत्रणासाठी बोरॅक्स (१.५ ग्रॅम/लिटर) आठवड्यातून दोनदा फवारावे. त्यासोबत पीक वाढीसाठी २ टक्के युरिया अथवा पाण्यात विरघळणारे खत फवारण्याचा सल्ला दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.