Beed News: नुकसानीची तत्काळ दखल घेत महसूल प्रशासनाने गांजपुर व चिंचपुर, धारूर शिवारात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. महसूल प्रशासनाच्या वतीने तत्काळ तहसीलदार श्रीकांत निळे, तलाठी रामचंद्र मुळे यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करण्यात सुरुवात केली आहे. .किल्लेधरूर तालुक्यात २२ व २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या जोरदार अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्वारी, हरभरा, गहू आदी पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. .Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे सुरूच; कमी मनुष्यबळाचा परिणाम.पिकांची स्थिती, पडलेले क्षेत्रफळ आणि अंदाजित नुकसान याची नोंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी ज्वारीचे पीक पूर्णपणे आडवे झाले असून हरभऱ्याचे घाटे पावसामुळे जमिनीवर पसरले आहेत. काही शेतकऱ्यांनी काढणीसाठी मजूर बोलावले असतानाच पावसाने हजेरी लावल्याने मोठा फटका बसल्याचे सांगितले..Crop Damage Survey : नाशिक जिल्ह्यात ९३ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण.तहसीलदारांनी शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. अवकाळीच्या सततच्या फटक्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत असून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे..काल व परवा सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत असून तत्काळ पंचनाम्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याचे माजलगाव मतदार संघाचे आमदार सोळंके यांनी कळविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.