Jalgaon News : खानदेशात विविध पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या. अधिकारी, लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे पूर्ण झाले. परंतु पंचनामे अपूर्णच आहेत. अनेक भागात महसुली कर्मचारी पोचलेच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. .विमा कंपनीकडे नुकसान झाल्यानंतर ७२ तासात ऑनलाईन तक्रार अनेक शेतकऱ्यांनी नोंदवून पंचनामे करण्याची तरतूद मागील हंगामात विमा योजनेतून होती. यामुळे मागील वेळेस विमा कंपनीकडूनही पंचनामे सुरू होते. .Crop Damage: पावसाने पावणेदोन लाख हेक्टरला बाधा.पण यंदा विमा योजनेत बदल केल्याने शेतकरी पिकहानीचे पंचनामे करून घेवू शकत नाही. महसुली कर्मचारी येतात, पण टेबलवर बसून आकडे लिहिले जातात, अशाही तक्रारी आहेत. जळगाव जिल्ह्यात मोठी हानी जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, एरंडोल या भागात अतिजोरदार पावसाने हानी झाली आहे. .Crop Damage Survey: अतिवृष्टी पंचनाम्यात फोटोसक्तीची पाचर.या महिन्यात या भागात दोन वेळेस अतिपाऊस झाला आहे. काही गावांत पाच ते सात तासात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. यात हानी वाढली आहे. त्याची आकडेवारी पंचनामे केल्यानंतरच समोर येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ही कार्यवाही तातडीने करून भरपाई मिळावी, अशी मागणी आहे..पीकविमा योजना कुचकामीपीकविमा योजनेतून खरिपातील पिकांसंबंधी विमा संरक्षण आहे. पावसाने नुकसानीसंबंधी परतावे दिले जातात. त्यासाठी यंदा उंबरठा उत्पादनाचा आधार घेतला जाईल. मागील १२ वर्षांतील उत्पादन व यंदाचे उत्पादन याचे आकडे लक्षात घेऊन पुढे परतावे मिळतील, यामुळे शेतकरी पीकविमा योजनेबाबत नाराज आहेत. अनेकांचा सहभाग या योजनेत नसल्याने शेतकरी शासकीय मदतीवर अवलंबून आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.