Jalgaon News : खानदेशात मागील महिन्यातील पावसात केळी, भाजीपाला व चाऱ्याची नासाडी, हानी झाली आहे. परंतु पंचनामे अपूर्णच आहेत. पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव भागात पंचनामे सुरूच असल्याची माहिती आहे. .एका तलाठ्यावर चार ते पाच गावांचा कार्यभार आहे. अनेक भागात रिक्त पदे आहेत. जेथे तलाठी आहे, तेथे कृषी सहायक नाही तर जेथे कृषी सहायक होते, तेथे तलाठी नसल्याने पिकहानीचे पंचनामे अपूर्ण असल्याची स्थिती आहे. .Crop Damage : नांदेडमध्ये सप्टेंबरमध्ये ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान.जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, नंदुरबार अशा सर्वच भागातून पंचनामे झालेच नाही, पंचनामे अपूर्ण आहेत, अशा तक्रारी आहेत. काही भागात नुकसान ३० टक्केही नाही, अशी बतावणी करून महसुली कर्मचारी पंचनाम्यांसाठी पोचलेच नाही. तर जेथे पंचनामे सुरू झाले, तेथे कमी मनुष्यबळाची अडचण आहे. भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव आदी भागात हानी अधिक झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत..Crop Damage Compensation : सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी ६४ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरणास मंजुरी .पाचोरा भागात कार्यवाही सुरूचजामनेर, पाचोरा व अन्य भागात केळीची मोठी हानी झाली आहे. महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून आपला अहवाल लागलीच सादर करणे आवश्यक असते. तसेच अतिजोरदार पाऊस झाल्यास लागलीच पाहणी करून माहिती देणे अनिवार्य आहे. परंतु आता दिवाळीची धामधूम सुरू होईल, यामुळे पंचनामे रखडले. पुढे तलाठी गावोगावी पोचलेच नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.