Maharashtra Agriculture : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुके वगळता उर्वरित भागात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. पावसाअभावी खरिपाच्या उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती निर्माण झाली असून, या संकटाच्या काळात माण, खटाव, खंडाळा आणि फलटण परिसरातील शेतकऱ्यांसाठी पीकविमाच एकमेव आर्थिक आधार ठरत आहे. यंदा विमा भरपाईसाठी ‘ट्रिगर’ची अट लागू नसल्याने बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता शासनस्तरावरील दुष्काळसदृश मदतीसह विमा भरपाईकडे डोळे लावून बसले आहेत..जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत एकूण १ लाख ६३२ शेतकऱ्यांनी सहभाग घेत पिकांचे संरक्षण केले आहे. शेतकऱ्यांनी एकूण ६६ लाख ८६ हजार ५२१ रुपयांचा विमा हप्ता भरला असून, त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार ५५९.७१ हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण लागू झाले आहे..Crop Insurance Model: ‘पॅरामेट्रिक’ पीकविमा योजना राबवा.तालुकानिहाय विचार करता, दुष्काळी पट्ट्यात मोडणाऱ्या माण तालुक्यातून सर्वाधिक ५३ हजार ६१२ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्यापाठोपाठ खटाव तालुक्यात १५ हजार ९६३, कऱ्हाड ५ हजार ८०९, जावळी ५ हजार ४७६, फलटण ४ हजार १७३, खंडाळा ४ हजार ६५४, कोरेगाव ३ हजार ८००, वाई २ हजार ९६६, सातारा २ हजार ४०८, पाटण १ हजार ५७५ आणि सर्वांत कमी महाबळेश्वर तालुक्यात अवघ्या १४० शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे..Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा.पावसाच्या मोठ्या खंडाचा सर्वाधिक तडाखा सोयाबीन, कडधान्ये आणि कांदा पिकांना बसला आहे. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पाणी न मिळाल्याने उत्पादनात ६० ते ७० टक्के घट होण्याची शक्यता आहे. माण व खटाव भागात मूग आणि उडदाच्या उत्पादनात ७० ते ८० टक्के घट झाली आहे. तर, खंडाळा तालुक्यात सरासरी ६५० हेक्टरवर होणारी कांदा लागवड यंदा अवघ्या २५ हेक्टरवर मर्यादित राहिली असून, रोपे करपली आहेत. पाऊस नसल्याने ऊस लागवडही केवळ २५ हजार हेक्टरवर थांबली आहे. या पार्श्वभूमीवर, पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून तत्परतेने आणि जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी तसेच पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे..माण तालुक्यात सर्वाधिक विमा सहभागमाण ५३,६१२ शेतकरीखटाव १५,९६३कऱ्हाड ५,८०९जावळी ५,४७६फलटण ४,१७३खंडाळा ४,६५४महाबळेश्वर १४०जिल्ह्यात एकूण १,००,६३२ शेतकरीविमा संरक्षित क्षेत्र ३३,५५९.७१ हेक्टर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.