Jalna News : जिल्ह्यात काही कृषी सेवा केंद्रांनी खतांची चढ्या दराने विक्री, बोगस बियाणे व कीटकनाशकांची विक्री यासह अनेक नियमांचे उल्लंघन केले. दरम्यान, कृषी विभागाने मागील तीन महिन्यांत विविध ठिकाणी कारवाया करत जिल्ह्यातील २९ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. .यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि योग्य दरात निविष्ठा उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा स्तर व तालुका स्तरावर गुण नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले. या पथकांनी जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रावर छापे टाकले असता त्यांना अनेक केंद्रांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. .दरम्यान, जिल्ह्यातील बियाणे १, खते २३ व कीटकनाशक ५ अशा एकूण २९ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली. तसेच २ निकृष्ट व विनापरवाना खत विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल केले आहेत..Fertilizer Production: युरिया, ‘एनपीके’च्या उत्पादनात मोठी वाढ.या कृषी केंद्रांचे परवाने निलंबितमनीषा कृषी सेवा केंद्र, रांजणी, वरद कृषी सेवा केंद्र, तीर्थपुरी, मोरया कृषी सेवा केंद्र,तीर्थपुरी, धनश्री कृषी सेवा केंद्र, घनसावंगी, माउली अॅग्रो ट्रेडर्स, वरूड बु, विघ्नहर्ता अॅग्रो ट्रेडर्स, तीर्थपुरी, माउली ट्रेडर्स, माहोरा, साई इंटरप्राईजेस & अॅग्रो, तीर्थपुरी, श्री कालिका कृषी सेवा केंद्र, रांजणी, न्यू अक्षय कृषी सेवा केंद्र, पारध, लालाजी कृषी सेवा केंद्र, माहोरा, जैन अॅग्रो सेंटर, वरूड बु, .मंगल कृषी सेवा केंद्र, माहोरा, पवन अॅग्रो सेंटर, भारज, जगदंब अॅग्रो एजन्सी, जाफराबाद, माउली अॅग्रो ट्रेडर्स, वरूड बु, शेतकरी अॅग्रो वर्ल्ड,वरुड बु, शीतल अॅग्रो ट्रेडर्स, जालना, गजानन अॅग्रो एजन्सी, रांजणी, चैतन्य कृषी सेवा केंद्र, वडीगोद्री,शेतकरी अॅग्रो एजन्सी, वडीगोद्री, गुरुकृपा अॅग्रो एजन्सी, वडीगोद्री, शिवशक्ती कृषी सेवा केंद्र, चितळी पुतळी, श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्र, राजूर, बालाजी अॅग्रो ट्रेडर्स, धनगरपिप्री, वरद कृषी सेवा केंद्र ॲण्ड मशिनरी, तीर्थपुरी, श्रीराम कृषी सेवा केंद्र, तीर्थपुरी इत्यादी..Overprized Fertilizer : जास्त दराने खते, बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक करा .यामुळे कारवाईविक्रेते यांच्याकडील साठा नोंदवही, बिल बुक, साठा फलक व भाव फलक प्रदर्शित न करणे, परवाना नूतनीकरण न करणे, ई-पॉस व प्रत्यक्ष खत साठा न जुळणे, गोडाऊन समाविष्ट न करणे, चढ्या दराने खते विक्री करणे, तसेच परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १५ दिवस ते १ वर्षासाठी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले..या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि योग्य दरात निविष्ठा उपलब्ध करून देण्याकरिता गुणनियंत्रण पथके स्थापन करण्यात आली होते. त्यांनी अनेक कृषी सेवा केंद्रांवर छापे टाकले असता यामधील २९ केंद्रांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर सुनावणी घेऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे निलंबन झालेल्या केंद्रांना निविष्ठांची विक्री करता येणार नाही.— गहिनीनाथ कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.