Agri Research: कापूस पिकात गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. त्याकरिता भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून मोठ्या निधीची तरतूद केली जाते. परंतु त्यानंतरही उत्पादकतेच्या बाबतीत देशांतर्गत पातळीवर फारशी समाधानकारक स्थिती नाही, अशी खंत ‘आयसीईएआर’चे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादवा यांनी व्यक्त केली. .डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने वनामती येथे आयोजित २१ वे अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. गुरुवार (ता. २) पासून सुरू झालेल्या या देश पातळीवरील बैठकीला प्रकल्पातील सुमारे ३०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ, खासगी बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित आहेत..Cotton Productivity: विशेष प्रकल्पातून कापूस उत्पादकतेत वाढ.उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह पाहुणे म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक विजय वाघमारे, पीक विज्ञान विभागाचे सहायक निर्देशक डॉ. पी. के. दास, डॉ. चारुदत्त मायी, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. के. शुक्ला, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, डॉ. संतोष गहूकर, डॉ. संजय काकडे यांची या वेळी उपस्थिती होती. .डॉ. यादवा पुढे म्हणाले की, कापूस हे देशातील मुख्य पीक आहे. सुमारे १३० लाख हेक्टरवर या पिकाची लागवड होते. महाराष्ट्रात या पिकाखालील ४५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. जागतिक स्तरावर लागवड क्षेत्राच्या बाबतीत देशाची आघाडी असली तरी उत्पादकतेच्या बाबतीत मात्र आपण पिछाडीवर आहोत. सध्या देशाची उत्पादकता ४६५ किलो रुई प्रति हेक्टर इतकी अत्यल्प आहे. महाराष्ट्रात तर हे प्रमाण केवळ ३५० किलो रुई प्रति हेक्टर इतकेच आहे. .Cotton Productivity: कापूस उत्पादकता वाढ केंद्र सरकारच्या अजेंड्यावर.केंद्र सरकार स्तरावरून कापसाची उत्पादकता वाढावी याकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली जाते. संशोधनात्मक कार्यासाठी हा निधी उपलब्ध केला जातो. मात्र त्यानंतरही गेल्या अनेक वर्षात कापूस उत्पादकता वाढ क्षेत्रात हाती फारसे काही लागले नाही. ही बाब देशभरातील शास्त्रज्ञांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. संशोधनात्मक कामाला प्राधान्य देत त्या माध्यमातून कापूस उत्पादकता वाढीचा उद्देश साधला गेला पाहिजे, असे सांगत २०३०-३१ पर्यंत देशाची कापूस उत्पादकता ८०० किलो रुई प्रति हेक्टरपर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली..अतिसघन लागवड पद्धती अंगीकारा ः डॉ. गडाखकुलगुरू डॉ. गडाख यांनी आपल्या भाषणात कृषी विद्यापीठाच्या पातळीवर कापूस संशोधन क्षेत्रात सुरू असलेल्या कामाचा लेखाजोखा या वेळी सादर केला. अतिसघन कापूस लागवड पद्धतीमुळे विदर्भात मोठे परिवर्तन होत असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. या माध्यमातून २५ ते ३० टक्के कापूस उत्पादकता वाढत असल्याचे समाधानकारक चित्र सध्या अनुभवले जात आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी अतिसघन कापूस लागवड पद्धतीचा अंगीकार करीत आहेत, असेही डॉ. गडाख यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.