Ahilyanagar News: ‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे’ हे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान संतापजनक आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असे किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले म्हणाले. मंत्री शेतकऱ्यांना डिवचणारी विधाने करत असतील तर एक दिवस परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा त्यांनी दिला..डॉ. नवले यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानाचा निषेध करून संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘सहकारमंत्री पाटील यांचे हे विधान अत्यंत संतापजनक आहे. राज्यातील बहुतांश भागात शेतकरी अतिवृष्टी, पुराने झालेल्या नुकसानीमुळे हैराण झाले आहेत..Ajit Navle: लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांचे वाटोळे.पिकांचे नुकसान झाले आहे, जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यात अतिवृष्टीच्या मदतीचा शासनादेश काढला त्यामध्ये अनेक अटी-शर्ती टाकल्यामुळे व अनेक जिल्हे, गावे वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संताप आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळेल की नाही याबाबत स्पष्टता सांगितली जात नाही. त्यात जबाबदार मंत्री अशी बेताल वक्तव्य करीत आहेत. ’’.‘वाचाळवीरांचा बंदोबस्त करा’डॉ. अजित नवले म्हणाले, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांत वाचाळवीरांची संख्या वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा वाचाळवीरांना आवरावे. अन्यथा शेतकरी चळवळ हा मुद्दा हाती घेईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.