Akola News : यंदाच्या खरीप हंगामात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून सध्या पिकाची स्थिती समाधानकारक आहे. सुरुवातीला पुरेसा पाऊस झाल्याने वाढ चांगली झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पश्चिम विदर्भात सतत पाऊस व ढगाळ वातावरण कायम आहे..यामुळे कपाशी पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या अवस्थेत सूर्यदर्शन न झाल्याने झाडांवरील पातेगळ मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती आहे..Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाला लगडली बोंडं .कपाशी पिकाला या टप्प्यावर सूर्यप्रकाशाची नितांत गरज आहे. भरपूर आर्द्रता व ढगाळ हवामानामुळे प्रकाशसंश्लेषणावर परिणाम झाला आहे. फूल, पाते गळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापूस उत्पादक शेतकरी गणेश नानोटे म्हणाले, की आमच्या शेतात सध्या कपाशीची वाढ चांगली दिसत आहे. .झाडांवर फुले, पात्यांची संख्याही चांगली आहे. तरी ढगाळ हवामान सतत राहिल्यास पातेगळ होईल. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता वाढू शकते. सध्याचे हे वातावरण सुधारावे हीच अपेक्षा आहे. हवामान खात्याने आणखी काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिल्याने अनेकांना धडकी भरली आहे. कपाशी पिकाला संतुलित वातावरणाची गरज आहे..Cotton Farming Tips : कापसाची उत्पादकता वाढण्याचा प्राथमिक अंदाज....तर संकटाचे ढगआगामी आठवड्यात हवामानात सुधारणा झाली नाही तर कपाशी पिकावर संकट ओढावेल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. यंदा बाजारपेठेत भाव कसे मिळतील याची आतापासूनच चिंता आहे. .त्यातच उत्पादन घटल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकतात. कपाशी पिकाला उभारी मिळण्यासाठी सध्या सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. सूर्यदर्शन आणि वातावरणात सुधारणा आवश्यक झालेली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.