Nashik News: किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या नोडल एजन्सीमार्फत ३ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ‘नाफेड’ने १.४७ तर ‘एनसीसीएफ’ने १.५० लाख टन कांदा खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र खरेदीत काही ठिकाणी अनियमितता व गोंधळ आहे. या दोन्ही संस्थांनी नियुक्त केलेल्या काही खरेदीदारांकडे दाखविलेल्या खरेदीप्रमाणे प्रत्यक्ष साठा नसल्याचे जोरदार चर्चा आहे. त्याचमुळे तिसऱ्यांदा दिल्लीतून आलेल्या दक्षता पथकाकडून कसून तपासणी होत आहे..काही ठिकाणी खरेदीदारांकडे खरेदीच्या तुलनेत उपलब्ध नसलेला कांदा साठा, प्रतवारी तसेच गुणवत्ता हा मुद्दा गंभीर आहे. त्यामुळे सुरुवातीला ‘एनसीसीएफ’ व ‘नाफेड’ या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधींनी खरेदीची स्थिती तपासली. त्यानंतर यासंबंधी गंभीर तक्रारी केंद्राकडे प्राप्त झाल्यानंतर थेट ग्राहक व्यवहार विभाग व सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच भारतीय अन्न महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. मात्र तरीही दाखवलेली खरेदी व प्रत्यक्ष साठ्याचा ताळमेळ बसत नसल्याचे समोर आले होते. .Onion Storage: कांदा साठवणीचे तंत्र, तज्ज्ञांचा सल्ला.त्यातच खरेदी आटोपली, यातील बराचसा कांदा खरेदीदारांकडे आहे. तर कांदा पुढील काही दिवसांत बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र साठ्याचा गोंधळ त्यात कांदा उत्पादकांकडून दोन महिन्यांपासून खरेदी करून त्यांना पैसे दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर संस्थांचे दक्षता पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कांदा खरेदीत बोकाळलेला गैरव्यवहार नियंत्रणात आणण्यासाठी ‘नाफेड’ने यंदा शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजूला सारून सहकारी संस्थांना खरेदी दिली..Onion Procurement : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ने खरेदी केलेला कांदा विकण्याची घाई नको.यात पारदर्शकता आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. तर ‘एनसीसीएफ’ने पुन्हा शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे खरेदी कायम ठेवली. त्यांचा आग्रह सुधारणा करण्याबाबत कधीही दिसून आलेला नाही. याउलट ‘एनसीसीएफ’च्या व्यवस्थापकीय संचालिका ॲनी जोसेफ चंद्रा यांच्याकडे अनेक गंभीर तक्रारी गेल्या होत्या..मात्र त्यांनीही पारदर्शकता असल्याचे वेळोवेळी सांगत दुर्लक्ष केले. अखेर गैरव्यवहारांचा भडका उडाल्यानंतर तत्कालीन शाखा व्यवस्थापक प्रशांत मिश्रा, वित्तीय सल्लागार शंकर रेड्डी यांची उचलबांगडी करण्याची नामुष्की ओढवली. मात्र तोपर्यंत मोठे ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होऊन ‘गैरव्यवहार’ वाढत गेला होता. त्यामुळेच हा गोंधळ कायम असून तिसऱ्यांदा शनिवार (ता. ३०) पासून पाहणी करत असलेल्या दक्षता पथकाला काही ठिकाणी हाच अनुभव येत असल्याचे सूत्राने सांगितले. .प्रत्येक तपासणीवेळी गोंधळ उघडखरेदीदारांनी केलेली कांदा खरेदी ‘सप्लाय व्हॅलिड’ या पोर्टलच्या माध्यमातून अधिकृत करण्यात येत होती. मात्र यामध्येही मोठा गैरप्रकार झाल्याचे मोठी चर्चा आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने यात हस्तक्षेप करून दक्षता समिती नेमली. मात्र यामध्येही सुरुवातीच्या काळात प्रत्यक्ष खरेदी व साठा जुळत नसल्याचे समोर आले होते. तर काही ठिकाणी गुणवत्तेचा प्रश्न देखील समोर आला. आता तिसऱ्यांदा दिल्लीतील ‘एनसीसीएफ’ चे ८ तर ‘नाफेड’चे ९ सदस्यीय दक्षता समितीचे पथक गेल्या तीन दिवसांपासून खरेदी केंद्राकडे तपासणी करत आहेत. मात्र खरेदी साठ्यासह काही ठिकाणी गुणवत्तेत देखील तफावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची देयके अदा होण्यास अजून उशीर होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.