Seed Shortage Khandesh: खरीप हंगाम तोंडावर आला असताना सोयाबीन बियाण्यांच्या वाढत्या किमती, उगवणक्षमतेबाबतची अनिश्चितता आणि मागणी असलेल्या वाणांचा तुटवडा यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. यंदा सोयाबीन लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी बियाण्यांशी संबंधित समस्या शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत..बियाणे टंचाई, उगवणक्षमतेच्या तक्रारी आणि गुणवत्तेबाबतच्या प्रश्नांवर कृषी विभागाकडून केवळ सूचना व आवाहने केली जात असून ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनत आहे..Soybean Seeds Availability: खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाण्याचा मोठा साठा उपलब्ध.सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांच्या किमतींमध्ये मोठी तफावत आहे. काही कंपन्यांचे ३० किलो बियाणे सुमारे ३,८०० रुपयांना, तर काहींचे ४,६०० रुपयांपर्यंत विकले जात आहे. लवकर येणारे वाण, कमी पावसात तग धरणारे वाण किंवा काळ्या कसदार जमिनीसाठी योग्य वाण अशा विविध दाव्यांसह बियाण्यांची विक्री सुरू आहे. मात्र, या दाव्यांच्या सत्यतेबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे..काही कृषी केंद्रांमधून आकर्षक दावे करून बियाण्यांची विक्री केली जात असली, तरी उगवणक्षमता कमी राहिल्यास किंवा उत्पादनावर परिणाम झाल्यास जबाबदारी स्वीकारण्यास कंपन्या आणि विक्रेते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. “बियाण्यांची हमी देता येत नाही,” असे सांगून कृषी केंद्रचालक जबाबदारी झटकत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे..Soybean Cultivation Tips: कमी पावसात सोयाबीन लागवडीसाठी महत्त्वाच्या टिप्स.अधिक मागणी असलेल्या काही वाणांची बाजारात टंचाई निर्माण झाली असून, त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी केंद्रांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. राज्य शासनाची बियाणे संस्था महाबीजची बियाणे बाजारात उपलब्ध झाली असून त्यालाही चांगली मागणी आहे. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे उगवणक्षमतेबाबतच्या तक्रारी यंदा वाढू नयेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत..खानदेशात यंदा सोयाबीन लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २६ ते २८ हजार हेक्टर क्षेत्रावर, तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मिळून ११ ते १२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सोयाबीनचे दर टिकून असल्याने शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे..शासनाकडून भविष्यात पुरेसा सोयाबीन उपलब्ध राहावा यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी बियाण्यांची टंचाई, वाढत्या किमती आणि गुणवत्तेबाबतच्या प्रश्नांमुळे या प्रयत्नांसमोर आव्हाने उभी राहत असल्याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.