Nashik News: उत्तर भारतातून आलेल्या शीतलहरींच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा सतत घसरत असल्याने पहाटेच्या वेळी गारठा जाणवत आहे. .सोमवारी (ता. १०) ९.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद कुंडेवाडी (निफाड) कृषी संशोधन केंद्रावर झाली. जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर आता ओसरला आहे. त्याच वेळी त्यानंतर थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटे ग्रामीण भागात धुक्याची चादर असते..Cold Wave: अकोल्यात थंडीचा जोर वाढू लागला .सकाळी थंडीचा कडाका वाढतो. निफाड, दिंडोरीबरोबरच अन्य तालुक्यांमध्ये किमान तापमानाच्या पाऱ्यात घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागामधील जनता थंडीने गारठून जात आहे..Cold Wave: धुळे, जळगाव, जेऊरमध्ये थंडीची लाट; राज्यात तापमान कमी होऊन थंडीचा कडाका वाढला.दरम्यान, राज्यभरातून अवकाळी पाऊस परतला आहे. त्यामुळे हवामान कोरडे झाले असून या कालावधीत ऊत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. थंडी वाढल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत..गत सप्ताहापासून टप्प्याटप्प्याने तापमानात घसरण होत आहे. मागील सप्ताहाच्या सुरुवातीला (ता. ३) २२ अंश सेल्सिअस तापमान होते. ते सप्ताहअखेर १२.५ अंशांवर आले. रविवारी ते ११ अंश सेल्सिअस होते. तर सोमवारी सप्ताहाच्या सुरुवातीस त्यात पुन्हा घसरण होऊन ते ९ अंशांवर आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.