Kharif Crop Insurance: खरीप हंगामात आधीच पावसाच्या अनिश्चिततेमुळे अडचणीत आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता वाढीव पीकविमा हप्त्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. जून-जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत पेरण्या रखडल्या असतानाच राज्य शासनाने शुक्रवारी (ता. ३) जाहीर केलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेच्या दरांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यासाठी भात, सोयाबीन आणि कापूस पिकांवर शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत वाढीव विमा हप्ता निश्चित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे..यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेची अंमलबजावणी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, कीड व रोगांमुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेले विमा हप्ते इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांना योजनेपासून दूर राहावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे..Crop Insurance Scheme: कुचकामी विमा योजना शेतकऱ्यांच्या माथी.भात पिकासाठी गडचिरोली जिल्ह्यात प्रति हेक्टर शेतकरी हिस्सा ५१२ रुपये, गोंदियात ६० रुपये, भंडाऱ्यात ५७५ रुपये आणि नागपुरात ६५ रुपये इतका आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात याच पिकासाठी शेतकऱ्यांना १३०० रुपये भरावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे कापूस पिकासाठी गडचिरोलीमध्ये ५९० रुपये, नागपूर व वर्धा येथे ६५ रुपये इतका हिस्सा निश्चित करण्यात आला असताना चंद्रपूरमध्ये तो थेट १३०० रुपये ठेवण्यात आला आहे. सोयाबीन पिकासाठीही अशीच तफावत असल्याचा शेतकरी संघटनांचा दावा आहे..Yavatmal Crop Insurance: पीकविमा भरपाईतून यवतमाळ जिल्हा वगळला.भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, मृदेचा प्रकार, पीकपद्धती आणि नैसर्गिक आपत्तींचा धोका शेजारील जिल्ह्यांप्रमाणेच असतानाही चंद्रपूरसाठी एवढा जादा विमा हप्ता निश्चित करण्यात आल्याबद्दल शेतकरी प्रश्न उपस्थित करीत आहेत. आधीच बियाणे, खते, कीडनाशके, मशागत, मजुरी आणि सिंचन खर्चामुळे आर्थिक ताण वाढला असताना वाढीव विमा हप्ता भरणे अनेक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहू शकतात. नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यांना आर्थिक संरक्षण मिळणेही कठीण होणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे..भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर निश्चित करण्यात आलेला पीकविमा हप्ता शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. या विसंगतीचा तातडीने फेरविचार करून चंद्रपूर जिल्ह्यावरील अन्याय दूर करावा.- सुधीर मुनगंटीवार, आमदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.