Gunny Bag Shortage: लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत बारदाना संपल्यामुळे हमीभावाने हरभरा खरेदी ठप्प झाली आहे. नोंदणी केलेल्या अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांची हरभरा खरेदी राहिली आहे. बारदानाची वाट पाहत बसण्यापेक्षा काही शेतकऱ्यांनी हमीभावाची आशा सोडून बाजारात हरभराची विक्री सुरू केली आहे. यातून मागील काही दिवसांत बाजारात हरभऱ्याची आवक वाढली आहे. खरेदी बंद पडल्यानंतर बाजारभावाची घसरण झाली असून एक दिवसात हे भाव अडीचशे ते तीनशे रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे बाजारभावाला हमीभावाची स्पर्धा सुरू ठेवण्यासाठी बारदाना उपलब्ध करून तातडीने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. .दोन्ही जिल्ह्यांत ‘नाफेड’ आणि शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदी सुरू आहे. या स्थितीत बाजारपेठेतही हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे. बाजारभाव व हमीभावात तेवढा फरक नसल्याने अनेक शेतकरी तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी बाजारात हरभरा विक्रीला प्राधान्य देत आहेत. तातडीच्या आर्थिक गरजा नसलेले शेतकरी हमीभावासाठी धडपड करत असल्याचे चित्र आहे. यातूनच दोन्ही जिल्ह्यांत ३१ मार्चची मुदत संपेपर्यंत चांगली हरभरा खरेदी झाली. .सरकारने मुदतवाढ दिली तरी पहिली मुदत संपेपर्यंत नोंदणी केलेल्या पैकी अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांची खरेदी राहिली आहे. काही दिवसांपासून बारदाना संपल्यामुळे केंद्रावरील खरेदी ठप्प झाली असून लवकरच बारदाना उपलब्ध होण्याची आशा शेतकऱ्यांना दाखवली जात आहे. दरम्यान सरकारने हरभऱ्याची हमीभावाने खरेदीसाठी मुदतवाढ दिली असली तरी मुदतीत बारदाना उपलब्ध होईल का आणि झाला तरी किती शेतकऱ्यांची खरेदी होईल, या बाबत शेतकऱ्यांना शंका आहे. .Paddy Procurement: धान्य खरेदीचे पैसे रखडले .बारदाना संपल्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. सोमवारी (ता. ६) पाच हजार ५२५ रुपये क्विंटल असलेला कमाल भाव मंगळवारी (ता. ७) पाच हजार ७९० रुपये क्विंटल झाला होता. यातूनच बाजारात हरभराची आवक वाढली होती. ३ एप्रिल रोजी १० हजार ७०२ क्विंटल आवक होती. त्यानंतर ती कमी होऊन सहा ते सात हजार क्विंटल दरम्यान झाली. आवक कमी होतात बाजारात तीनशे रुपये क्विंटलने भाव वाढले तर बारदाना लवकर उपलब्ध होण्याची स्थिती नसल्याचे दिसून ते अडीचशे रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारभावाची चढउतार सुरू असताना शेतकरी हमीभावाने हरभरा विक्रीसाठी बारदाना येण्याची वाट पाहात आहेत..Chana MSP Procurement Centers: सोलापूर जिल्ह्यात केवळ बार्शीतच हमीभाव खरेदी केंद्र सुरू.हरभरा खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया १ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत निश्चित करण्यात आली होती. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठीठी नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत तर खरेदीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. नोंदणी ऑनलाइन असून, कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. बारदाना दोन दिवसांत येणार असून शेतकऱ्यांनी वाढलेल्या मुदतीत नोंदणी करून हमीभावाने हरभरा विक्री करावी.- मनोज बाजपेयी, जिल्हा पणन अधिकारी, लातूर व धाराशिव.आमच्या खरेदी केंद्रावर १७ मार्च रोजी बारदाना उपलब्ध झाला होता. त्यानंतर आजतागायत बारदाना उपलब्ध झालेला नाही. हरभऱ्याची खरेदी ठप्प झाली आहे. हरभऱ्याची मोजणी बाकी राहिली असून, त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या व ‘नाफेड’च्या केंद्रांबाबत शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे. केंद्रांना बारदाना उपलब्ध करून द्यावा किंवा खरेदी केंद्रांना बाजारातून चालू बाजारभावाने बारदाना खरेदी करण्यास परवानगी द्यावी.- सचिन पुरी, भातांगळी, ता. लातूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.