Onion Prices Crash: चाकण येथील बाजारात कांद्याला प्रतिकिलोला सहा रुपये असा नीचांकी भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असताना बाजारातील भाव अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे..चाकण (ता. खेड) येथील बाजार कांदा खरेदी-विक्री तसेच निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. निर्यातदार कंपन्या, व्यापारी मोठ्या प्रमाणात येथून कांदा खरेदी करतात. परंतु, निर्यातही सध्या ठप्प आहे. त्यामुळे देशांतर्गतच कांद्याची विक्री होत असल्यामुळे भाव गडगडले आहेत. कांद्याचे बी, रोप, खत, औषधे, मजुरी, वाहतूक यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा भाव हा उत्पादन खर्चही भरून काढू शकत नाही अशी स्थिती आहे..Onion Price Crash: कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्याने वावरातच सोडले पीक.राज्यात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक मोठ्या आशेने घेतले होते. चांगले उत्पादन मिळूनही बाजारभाव घसरल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काही शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात आणण्याऐवजी वखारीत साठवून ठेवत आहेत. यातही कांदा खराब होण्याची भीती असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे..सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव द्यावा तसेच निर्यात धोरण सुलभ करावे अशी मागणी शेतकरी संघटना करीत आहेत. किरकोळ बाजारात ग्राहकांना स्वस्त कांदा मिळत असला तरी उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या भावातील ही घसरण कायम राहिल्यास पुढील हंगामात कांदा लागवड कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने योग्य वेळी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे..Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश.उत्पादन खर्चही वसूल होईनाबाजारात कांद्याला प्रति किलोला सहा ते बारा रुपये भाव मिळत असून यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. एकरी उत्पादनाला पन्नास हजार रुपये खर्च येतो मात्र, सध्या कांदा विकून फक्त वीस, पंचवीस हजार रुपये मिळाले तर करायचे काय? असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत..‘मुख्यमंत्र्यांची घोषणा अमलात यावी’कांद्याचा भाव घसरल्याने १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो या दराने कांदा खरेदी करून शासन शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही घोषणा प्रत्यक्षात अमलात आणून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे असे कांदा उत्पादक शेतकरी ईश्वर गायकवाड, व्यापारी जमीरभाई काझी यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.