Farming Crisis: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस-केणीवाडा (ता. सावंतवाडी) येथे लागलेल्या आगीत दहा एकर क्षेत्रातील काजूची झाडे जळाली. याशिवाय आंबा आणि इतर झाडांचेही नुकसान झाले. चार ते पाच शेतकऱ्यांचे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग रविवारी (ता. ५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लागली..पाडलोस-केणीवाडा येथे मोठ्या प्रमाणात काजू लागवड आहे. याशिवाय आंबा लागवडही काही प्रमाणात आहे. रविवारी दुपारच्या सुमारास या परिसरात आग लागली. सुकलेले गवत आणि वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. .Cashew Orchard Fire : वेत्ये येथे काजू बागेला आग.माळरानावरील या आगीने रस्ता ओलांडून काजू बागांमध्ये प्रवेश केला. स्थानिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. चार ते पाच शेतकऱ्यांच्या काजू बागांमध्ये आग पोहोचली..Cashew Orchard Fire: बांदा देऊळवाडीत पाच एकरांवरील काजू कलमे जळाली.या आगीत पाच शेतकऱ्यांच्या दहा एकर क्षेत्रातील एक हजारांहून अधिक झाडे जळाली आहेत. शेतकऱ्यांचे सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. cashew fire, orchard fire, crop damage, farmers loss, sindhudurg news, agriculture loss, mango trees, plantation damage, rural india, farming crisis, agri news, fire incident, crop loss, india farming, breaking news.काजू हंगाम सुरू असतानाच आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जमिनीवर पडलेली काजूची बीदेखील जळाली आहेत. ही आग नेमकी कशी लागली, हे मात्र शेतकऱ्यांना समजू शकलेले नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.