Ratnagiri News: कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू बागांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. .संगमेश्वर तालुक्यातील हरेकरवाडी येथे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बागेत जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच ताम्हाणे, कोसुंब येथेही कीड व्यवस्थापन व प्रक्रिया उद्योगांबाबत मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली..Orchard Management: वाढत्या थंडीत फळबागांची घ्यावयाची काळजी.हरेकरवाडी येथील प्रगतशील शेतकरी देवेंद्र फडकले यांच्या आंबा व काजू बागेला विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अंबर सणस यांनी भेट दिली. सध्याच्या वातावरणात आंबा मोहराचे संरक्षण कसे करावे, तसेच तुडतुडे, फुलकिडे यांसारख्या कीड व रोगांचे प्रभावी व्यवस्थापन कसे करावे, या बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली..Mango Orchard Management: अतिपावसाच्या स्थितीत आंबा बागेचे व्यवस्थापन.या वेळी चिपळूणचे उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी बागेच्या सर्वांगीण व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. बागेची स्वच्छता, योग्य खत नियोजन व संतुलित पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ कशी साधता येते, .हे त्यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट केले. यानंतर ताम्हाणे व कोसुंब येथे आयोजित मार्गदर्शन शिबिरात पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.