Irrigation Pump Theft: कारंजा तालुक्यातील उंद्री धरण परिसरात चोरट्यांनी धुडगूस घालत १० शेतकऱ्यांच्या मोटार पंपांना जोडलेले विजेचे केबल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सिंचन व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, बांबर्डा व कुपटी वापटी येथील गौरव कानकीरड, वैभव कानकीरड, दिगंबर राऊत, गोपाल भेंडे, प्रवीण काचगुंडे, स्वप्निल कानकीरड, धर्माजी तायडे, बाळू वानखडे, प्रविण टाके आणि उमेश भेंडे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील प्रत्येकी सुमारे २०० ते ३०० फूट लांबीचे केबल चोरट्यांनी चोरून नेले..Agriculture Pump: उन्हाळ्यात कृषि पंप का जळतो? कारणे आणि उपाय जाणून घ्या.या चोरीमुळे शेतकऱ्यांच्या मोटारी बंद पडल्या असून पिकांना पाणी देणे थांबले आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे आधीच पाण्याची टंचाई भासत असताना ही घटना घडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे..विशेषतः उन्हाळी पिके व भाजीपाला यावर याचा तात्काळ परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रत्येक शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून नवीन केबल खरेदी करणे ही मोठी आर्थिक कसरत ठरत आहे. उंद्री धरण परिसरात यापूर्वीही किरकोळ चोरीच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले..Agriculture Theft: बोरगाव येथे सौर कृषी वाहिनी प्रकल्पातील वायर, साहित्याची चोरी.मात्र, आता मोठ्या प्रमाणावर केबल चोरी होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक वाटत असल्याचेही काहींनी व्यक्त केले. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, रात्रीची गस्त वाढवावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.