Agriculture Ministry Seed Price Decision: केंद्राच्या कृषी विभागाने आगामी खरीप हंगाम २०२६-२७ साठी बीटी कापूस बियाण्यांच्या कमाल किरकोळ किमतीत (एमआरपी) कोणताही बदल केलेला नाही. यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी (ता. २३) जारी करण्यात आली..त्यामुळे बोलगार्ड-१ आणि बोलगार्ड-२ या दोन्ही वाणांचे दर मागील वर्षीप्रमाणेच कायम राहिले आहेत. गेल्या वर्षी सरकारने बोलगार्ड-२ (४५० ग्रॅम पॅकेट) साठी ९०० रुपये एमआरपी निश्चित केली होती. २०२४-२५ मध्ये ती ८६४ रुपये होती. तर, ६३५ रुपये प्रति पॅकेट ही बोलगार्ड-१ ची किंमत २०१६ पासून स्थिर आहे..Bt Cotton Seeds Rate : २०२६ च्या खरीपसाठी बीटी कपाशी बियाण्यांचे दर 'जैसे थे'; केंद्र सरकारचा निर्णय.यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, बियाणेदराशी संबंधित समितीच्या शिफारशी विचारात घेऊन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी बीटी कापूस बियाण्यांचा कमाल विक्री दर हा २७ मार्च २०२५ रोजी जाहीर केलेल्या दराप्रमाणेच ठेवण्यात आला आहे. या बियाण्यांमध्ये ‘रिफ्युजिया-इन-बॅग’ (५ ते १० टक्के नॉन-बीटी कापूस) समाविष्ट असतो..यंदा दरात बदल होणार नाही, अशी शक्यता यापूर्वीच वर्तविण्यात आली होती. गेल्या वर्षी सुमारे ४ टक्के दरवाढ झाल्याने यंदा दर वाढविण्यात न आल्याचा बियाणे उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही, असे संकेत आहेत. मात्र महागाईनुसार दरवाढ करण्याची मागणी बियाणे उद्योगाने रेटून धरली होती..Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान.‘कापूस बियाणे (किंमत नियंत्रण) आदेश २०१५’ अंतर्गत दरवर्षी एमआरपी जाहीर करणे सरकारसाठी बंधनकारक आहे. यासंदर्भात मार्चमध्ये संबंधित भागधारकांची बैठकही घेण्यात आली होती..दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय किसान संघाने बीटी कापूस बियाण्यांच्या किंमत निर्धारणाला विरोध दर्शविला आहे. त्यांच्या मते, यामुळे नॉन-जीएम कापूस बियाणे ३०० ते ४०० रुपयांत विकले जात असून, यामुळे बाजारात असमतोल निर्माण होत आहे. तसेच, गुलाबी बोंडअळी (पिंक बॉलवर्म) विरोधातील बीटी कापसाची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने दर जाहीर करण्याची गरज नसल्याचे भारतीय किसान संघाचे म्हणणे आहे..सरकारने २०१६ मध्ये बियाण्यांसाठी एमआरपी लागू केली होती. कारण त्यापूर्वी शेतकऱ्यांकडून बीटी बियाण्यांसाठी जास्त दर आकारले जाण्याचे प्रकार घडत होते..बियाणे वापराबाबत केंंद्र सरकारचा पवित्राबीटी कापसासंदर्भात लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले होते, की देशातील सुमारे ९५ टक्के कापूस क्षेत्र बीटी कापसाखाली आहे. मात्र गुलाबी बोंड अळीने बीटी प्रथिनाविरोधात प्रतिकारशक्ती विकसित केल्याने ती या पिकाला भेडसावणारा प्रमुख शत्रू बनली आहे. .तसेच, रसशोषक किडींचा देखील प्रादुर्भाव वाढत असून शेतकऱ्यांचा कीटकनाशकांवरील खर्च वाढला आहे. सुरुवातीच्या काळात बीटी कापसामुळे कीटकनाशकांचा वापर कमी झाला असला, तरी सध्याच्या परिस्थितीत उत्पादन वाढीवर त्याचा तितकासा सकारात्मक परिणाम होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.