Rural Innovation: मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा गॅस टाक्यांच्या वितरणावर विपरीत परिणाम झाला आहे. नोंदणी करूनही गॅस टाकी मिळत नसल्याने शहरासह ग्रामीण भागात लोक त्रस्त आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या मदतीने बायोगॅस संयंत्र उभारणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे १२०० शेतकरी कुटुंबांना मात्र गॅसची चिंता भेडसावत नसल्याचे चित्र आहे. Biogas Energy.दैनंदिन वापरासाठी लागणारा गॅस बायोगॅस संयंत्रामुळे सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनिश्चिततेच्या काळात आपण मात्र ‘टेन्शन फ्री’ असल्याची प्रतिक्रिया या कुटुंबांकडून येत आहे. त्यामुळे इतरांकडून बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी मागणी वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली..Vermicompost Briquettes: व्हर्मी कंपोस्ट, डीएपी खताचेही तयार होणार ब्रिकेट.ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचा घरगुती इंधनावरील (गॅस) खर्च कमी व्हावा यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून पशुपालक शेतकऱ्यांसाठी बायोगॅस संयंत्र उभारणी योजना राबविली जाते. केंद्र सरकारकडून या योजनेत सहभागी होणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९८०० रुपयांपासून ते ५२ हजार ८०० रुपयांपर्यंत तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना १७ हजार रुपयांपासून ते ७० हजार ४०० रुपयांपर्यंत घनमीटरनुसार अनुदान दिले जाते..पशुपालक शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात हे संयंत्र उभारावे, यासाठी केंद्र सरकारच्या प्रवर्गनिहाय अनुदानासोबतच सेसमधून ४९०० रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. बायोगॅससोबत शौचालय उभारणीसाठीही अनुदान दिले जाते. २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे १२०० शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्रे उभारली आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बायोगॅस प्रकल्पांना भेट देऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत..Natural Farming: शेलगावच्या शेतकऱ्यांनी अनुभवले गोवंशाधारित नैसर्गिक शेती तंत्रज्ञान.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बायोगॅस संयंत्र उभारणीची योजना राबवली जाते. त्यासाठी अनुदान दिले जाते. सध्या गॅस टाकी मिळण्यात अडचणी येत आहेत. मात्र बायोगॅस संयंत्र उभारणाऱ्या शेतकऱ्यांना अशा गॅस इंधनाबाबत कोणतीही चिंता नसल्याचे आम्हाला पाहणीत दिसून येत आहे.- सुधीर शिंदे, कृषी विकास अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद.यंदा केंद्राकडून उद्दिष्टच नाही!यंदाही बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी शेतकरी अनुदानाची मागणी करत आहेत. मात्र यंदा केंद्र सरकारकडूनच नव्याने बायोगॅस संयंत्र उभारणी करण्यासाठीचे उद्दिष्ट आलेले नाही. त्यामुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकही बायोगॅस प्रकल्प उभारला गेला नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेतील सूत्रांनी दिली..जिल्ह्यातील बायोगॅस संयंत्राचा लेखाजोखाराहुरी ः ८०, शेवगाव ः ३७, श्रीगोंदा ः ६९, राहाता ः ४५, जामखेड ः ३६, अकोले ः ८३, पाथर्डी ः ५३, श्रीरामपूर ः ५९, नेवासा ः १०४, अहिल्यानगर ः १७२, कोपरगाव ः ७१, पारनेर ः १७२, संगमनेर ः १४७, कर्जत ः ४५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.